Water Shortage : टंचाईच्या झळा; संभाजीनगर जिल्ह्यातील विहिरींनी गाठला तळ, फळबागा वाळू लागल्या

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.
Water Shortage
Water ShortageSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या प्रचंड (Sambhajinagar) झळा जाणवू लागल्या आहेत. आता विहिरीने देखील तळ गाठला आहे. यामुळे आता पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. (Breaking Marathi News)

Water Shortage
Nandurbar News : भगर खाल्ल्याने १२५ जणांना विषबाधा; नंदुरबार जिल्ह्यातील दोन गावात घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस (Rain) न झाल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे आता या फळबागा कशा वाचव्यात हा मोठा प्रश्न (Farmer) शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांनी पाण्या अभावी फळबागांवर कुऱ्हाड सुद्धा चालवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Shortage
Farmer Success Story : पारंपरिक धान शेतीला फाटा; तिखट मिरची उत्पादनातून केली कमाल, शेतकरी झाला मालामाल

बाग वाचविण्यासाठी उपाय 

जिल्ह्यात पाण्याची समस्या जाणवू लागल्याने शेतकरी आपल्या फळबागा वाचविण्यासाठी विविध उपाय योजना करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे राहिले असल्याने मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com