छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्याला देखील जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशात पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथील गावानजीक असलेल्या कोल्ही नदीत जैतपुर वरुन घरी जात असलेल्या शेतकऱ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडाला. ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात यश आले.
रात्रीपासून संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी- नाल्यांना देखील पूर आला आहे. यातच पैठण तालुक्यातील पैठणखेडा गावात शेतातुन घरी येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी बुडाला होता. शेतकरी गणेश रावसाहेब साबळे (वय ३२) गे शेतातून घरी परतत असताना ही घटना घडली होती.
एक तासाच्या प्रयत्नांनी काढले बाहेर
नदीच्या काठावर असलेल्या शेतकरी व नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. तब्बल एक तास प्रयत्न करत मोठ्या दोरीचे सहाय्याने गणेश साबळे याना पाण्याबाहेर काढले आहे. पाण्यात बुडालेल्या गणेशला स्थानिक नागरिकांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे दाखल केले असुन प्रथमोपचार करत सद्यस्थितीत शेतकरी व्यवस्थित आहे.
शेतवस्तीवर अडलेल्या २२ जणांना काढले बाहेर
मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती आहे. काही ठिकाणी गावांमध्ये पाणी शिरले असल्याने नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. दरम्यान अमळनेर येथे शेतवस्तीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंब पुरात अडकले होते. या अडकलेल्या ५ कुटुंबातील २२ व्यक्तींना बोटीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून शाळेमध्ये निवारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.