रत्नागिरी : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र पाण्याची समस्या जाणवत आहे. राज्यातील सर्वच धरणांची पाणी पातळी खालावली असल्याने पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत आहे. या दरम्यान (Ratnagiri) रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी पातळी देखील खालावली असून शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. (Breaking Marathi News)
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) झाला आहे. परिमाणी काही मोजक्या नद्यांनाच एक- दोन वेळा पुराचे पाणी आले होते. यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत देखील फाकले आहे. यामुळे विहिरी कोरड्या पडल्याची स्थिती पाहण्यास मिळत आहे. मुख्य म्हणजे बहुतांश धरणातील पाणी साठा देखील कमी होऊ लागला आहे. यामुळे (Water Crisis) पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे. शीळ धरणाची देखील पाणी पातळी कमी होत असून रत्नागिरीत पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आठवड्यातून दोन वेळेस पाणी कपात
पर्जन्यमान कमी झाल्यानं शीळ धरणात कमी पाणी साठा आहे. यामुळे मार्च महीन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना रत्नागिरीकरांना करावा लागत आहे. आता रत्नागिरीकरांना आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. तर एप्रिल आणि मे महीन्यात भीषण पाणी टंचाईचा सामना रत्नागिरीकरांना करावा लागण्याची शक्यता असून १५ जूनपर्यंत जेमतेम पाणीपुरवठा होईल एवढाच धरणात पाणीसाठा असल्याचे सांगितले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.