मोठी बातमी! कॉग्रेस, राष्ट्रवादीने रणनीती बदलली, काय आहे नवा प्लान?

राज्यसभेत मतदान करण्यासाठी महाविकास आघाडीने नवा प्लॅन आखला होता.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला (Rajya Sabha Election voting) सुरूवात झाली आहे. आतापर्यंत राज्यसभेसाठी 50 टक्के मतदान झालं आहे. अशातच मतदान सुरू असतानाच काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) अचानक मतांचा कोटा वाढवला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यसभेत मतदान करण्यासाठी महाविकास आघाडीने नवा प्लॅन आखला होता. मात्र, अचानक राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने मतांचा कोटा 44 केल्याचे कळते. (Rajya Sabha Election 2022 Latest News)

Uddhav Thackeray
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन मतं कमी

मतांचं काय ठरलं होतं?

दरम्यान, राज्यसभेत मतदान करण्यासाठी आज सकाळी महाविकास आघाडीची रणनिती ठरली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीचे 42 आमदार मतदान करणार होते. यावेळी प्रत्येक उमेदवाराला 42 मते देण्याचं ठरलं होतं. मात्र, अचानक राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 44 केला आहे. मतं बाद होऊन दगाफटका होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
Rajya Sabha Election: महाविकास आघाडीतला एक संजय नक्की जाणार; अनिल बोंडेंचा रोख नेमका कोणाकडे?

शिवसेनेनं वृत्त फेटाळलं

दुसरीकडे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आपल्या मतांचा कोटा वाढवला असल्याचं वृत्त शिवसेनेकडून फेटाळण्यात आलं आहे. कोणीही मतांचा कोटा वाढवला नाही. ही भाजपने पेरलेली बातमी आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तर कोणी काही सांगू द्या. मतांचा कोटा वाढलेला नाही. संध्याकाळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com