
पतंजली नागपूरमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे विदर्भाच्या विकासाला हातभार लागणार आहे. नागपूरमधील मिहान येथील पतंजलीचा मेगा फूड अँड हर्बल पार्क प्रकल्प सुरू करण्यात आलाय. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प ठरणार आहे. याचे उद्घाटन आज रविवारी होणार आहे. या मेगा फूड पार्कमध्ये दररोज ८०० टन फळांवर प्रक्रिया होणार आहे. यामुळे विदर्भाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन घडेल अशी आशा आहे.
विदर्भ म्हटलं की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे चित्र डोळ्यासमोर येत असते. मात्र नागपूरातील मिहानमधील ऑरेंज प्रोसेसिंग प्लांटमुळे हे चित्र बदलणार आहे. यासाठी आम्हाला गावकरी आणि शेतकऱ्यांचे सहकार्य हवे, या प्रकल्पाने शेतकरी आणि कृषी व्यवस्थेचे संपूर्ण चित्र बदलेल, असे पंतजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण म्हणालेत.
मिहान येथे ‘पतंजलि मेगा फूड एंड हर्बल पार्क’ ऑरेंज प्रोसेसिंग हा आशियातील सर्वात मोठा प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती पंतजली आयुर्वेद लिमिटेडचे एमडी आचार्य बालकृष्ण यांनी दिली. हा प्लांट फूड प्रोसेसिंगचा सिंगल प्वॉईंट आणि आशियातील सर्वात मोठे युनिट्स आहे. पंतजली नवी कृषी क्रांती आणणार असून देशाच्या शेतकऱ्यांना समृद्धीची नवी दारे उघडणार असल्याचं आचार्य बालकृष्ण यावेळी म्हणालेत.
हा प्लांट सुरू करण्यात अनेक अडथळे आले. मध्येच कोरोना विषाणूचा काळही आला. पण आज तो दिवस आला ज्याची परिसरातील शेतकरी वर्षानुवर्षे वाट पाहत होते," असे आचार्य बाळकृष्ण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नागपूरमधील मिहान येथील पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क प्रकल्पची किंमत ₹१,५०० कोटी आहे.
रविवारी याचं उद्धाटन होणार आहे. उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू रामदेव उपस्थित राहणार आहेत. या सुविधेतून विविध फळांचे रस आणि फळांपासून इतर उत्पादने देखील तयार केली जातील. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होईल आणि प्रादेशिक रोजगार निर्माण होईल.
नागपूरमधील पतंजली संत्रा प्रक्रिया प्रकल्प हा आशियातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रगत आहे. "आम्हाला तो स्थापित केल्याचा अभिमान आहे," असे पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण म्हणाले. या प्लांटची दररोज ८०० टन प्रक्रिया क्षमता असून हा प्लांट शून्य-कचरा प्रणालीवर काम करणारे आहे.
संत्र्याच्या सालीवरही प्रक्रिया केली जाणार आहे. संत्र्याच्या सालीपासून वाष्पशील आणि सुगंधी तेल काढलं जातं. उत्पादनांची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे आणि संपूर्ण जागतिक बाजारपेठ खुली असल्याचा दावा व्यवस्थापकीय संचालक करत आहेत. कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार, मिहान प्लांटमध्ये संत्रा, लिंबू, आवळा, डाळिंब, पेरू, द्राक्षे, दुधी, गाजर, आंबा आणि संत्र्याचा गर आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट यांचे उत्पादन देखील केले जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.