पंकजा मुंडेंचे गृहमंत्र्यांना पत्र बीड जिल्हयातील पोलिस यंत्रणेवर उपस्थित केले प्रश्न

बीडमध्ये मोठया प्रमाणात चोऱ्या, खून, मारामाच्या महिलांवर अत्याचार वाढले आहेत. खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : भाजपनेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पत्र लिहिलेआहे. हे पत्र बीड जिल्हयातील कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक घेण्यासाठी लिहलं आहे. त्यांनी लिहलंय, 'गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हयातील (Beed District) कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना जिल्हयात मोठया प्रमाणात वाढल्या आहेत.

तसंच चोऱ्या, खून, मारामाच्या महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. बीड, परळी, अंबेजोगाई, माजलगांव, गेवराई सह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला आहे. पोलिसांचा कसलाही धाक अथवा नियंत्रण राहिले नाही. जिल्हयात पोलिस यंत्रणा आहे की नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.' असं पंकजा मुंडे यांनी पत्रात लिहिले आहे.

Pankaja Munde
Corona काळात नोकरी गेल्याने करु लागला चोऱ्या, आरोपीकडून जप्त केल्या तब्बल 20 गाड्या

तसंच गुन्हेगारीच्या वाढत्या घटना जिल्हयासाठी अतिशय चिंताजनक बाब बनली आहे. अशा घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बीडच्या कायदा सुव्यवस्था विषयावर सर्व संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करावी असे पत्र पंकजा मुंडे यांनी लिहिले आहे

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com