सांगली : पुरोगामी महाराष्ट्रात (maharashtra) आता असलेले आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ हे दागी मंत्रिमंडळ आहे अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी महाविकास आघाडी (mva) सरकारवर केली आहे. मुंडे यांची सांगली लाेकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्त झाल्यानंतर प्रथमच त्या सांगली जिल्ह्याच्या दाै-यावर आल्या हाेत्या. माध्यमांशी संवाद साधताना मुंडे यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले. (pankaja munde latest marathi news)
देशात मोदींनी कॉंग्रेसमुक्तचा (congress) नारा दिला आहे आणि हाच नारा आम्ही महाराष्ट्रात दिला आहे. दरम्यान आगामी काळात महाराष्ट्र भाजपयुक्त असेल असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षात गेले आहेत. या प्रश्नावर मुंडे म्हणाल्या एक व्यक्ती गेला म्हणून पक्ष संपला असे हाेत नाही. दरम्यान शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीकडे बातमी म्हणून बघते. दरम्यान पवार हे भाजप स्थापना दिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले असतील असेही मुंडे यांनी नमूद केले.
दरम्यान महादेव जानकर (mahadev jankar) आमच्यापासून दूर जाऊ नयेत याची खबरदारी आम्ही घेऊ. ओबीसी आरक्षण (obc reservation) टिकावे म्हणून यासाठी कोल्हापूरला (kolhapur) जाऊन जोतिबाला साकडे घातले आहेत असे मुंडे यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.