Ujani Dam : ४४ वर्षानंतर उजनी धरणाची निच्चांकी पाणी पातळी; पाणी योजना अडचणीत

Pandharpur News : पाऊस कमी झाल्यामुळे धरणात देखील पुरेसे पाणी साचले नाही. धरणात जे पाणी आहे. ते देखील बाष्पीभवनामुळे कमी होत चालले असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे
Ujani Dam
Ujani DamSaam tv

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणाने तळ गाठला आहे. मे अखेर धरणाची पाणी पातळी गेल्या ४४ वर्षानंतर प्रथमच निच्चांकी पातळीपर्यंत गेली आहे‌. सध्या उजनी धरणात वजा ५९.३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणावरील सर्व पाणी पुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.

Ujani Dam
Papaya Crop : अज्ञात माथेफिरूने तोडले पाचशेहून अधिक पपईचे झाडे; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

पाऊस कमी झाल्यामुळे धरणात देखील पुरेसे पाणी साचले नाही. धरणात जे पाणी आहे. ते देखील बाष्पीभवनामुळे कमी होत चालले असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. हीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची (Ujani dam) झाली आहे. उजनी धरणात गाळ आणि वाळू मोठ्या प्रमाणावर साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे यंदा धरण कोरडे पडल्यामुळे धरणातील गाळ काढावा; अशी मागणी होत आहे. 

Ujani Dam
Cotton Seeds : कापूस बियाणं पॅकेट १४०० रुपयांना विक्री; अकोल्यात भरारी पथकाची कृषी केंद्रावर कारवाई

दीड महिना तरी पाण्याची समस्या 

२०१४ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी धरणाची पाणी पातळी जूनमध्ये वजा ५९.०५ टक्केपर्यंत खाली गेली होती. (Solapur) यंदा मात्र मे अखेर धरण निच्चांकी पाणी पातळीवर गेले आहे. सरासरी जुलैपासून धरणात पाणी येण्यास सुरवात होते. त्यामुळे आणखी दीड ते दोन महिने ‌पाणी कसे पुरवायाचे याची चिंता लागली आहे. पावसाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com