
नवी मुंबईकरांसाठी पाण्याबाबत महत्वाची बातमी समोर आलीये. नवी मुंबईतील काही शहरांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच जास्त पाण्याचासाठा करून ठेवावा असं आवाहन सिडकोमार्फत करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटीत येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. हेटवणे धरणातून नवी मुंबईला होतो पाणी पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.
सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनीवरील देखभाल तसेच दुस्स्कीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा येथे पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.