Jitendra Awhad: सनातन धर्मानं छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं; जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

Jitendra Awhad’s Controversial Statment: सनातन धर्माने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadX
Published On
Summary
  • जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर टीका करत संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

  • शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास सनातन धर्माने विरोध केल्याचा दावाही केला.

  • या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले असून प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • इतिहासाचा संदर्भ देत केलेल्या विधानामुळे जनभावना दुखावण्याचा धोका निर्माण झालाय.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आमदार जिंतेद्र आव्हाड यांनीही सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलंय. सनातन धर्म हा धर्मच नव्हताच, सनातन धर्माने भारताचे वाटोळं केलंय. सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला. छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करून टाकले, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

आज अचानक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंची भेट झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केलंय. तसेच सनातन धर्मावर गंभीर आरोप केलेत. आव्हाड यांच्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलं होतं.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना एनआयएच्या कोर्टाने निर्दोष मुक्तता केलीय. त्यानंतर राज्यात भगवा दहशतवादाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय. त्याचदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलं.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हिंदू किंवा सनातन दहशतवाद म्हणा, कारण भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्रता आंदोलनाचे प्रतिक आहे. आता त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीच रीघ ओढत सनातन धर्मावर वादग्रस्त विधान केलंय.

Jitendra Awhad
दिल्लीहून परतताच शिंदेंचा ठाकरेंना दणका! साडे अकरा वाजता बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

सनातन धर्म हा धर्मच नव्हताच, सनातन धर्माने भारताचे वाटोळं केलंय. ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला. छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करून टाकलंय. महात्मा फुले यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण -गोटे टाकले. ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad
Maharashtra Politics : शिवसेनेला मोठं खिंडार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का

सनातन धर्माने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाणी पिऊन दिले नाही, शाळेत जाऊन दिले नाही. सनातन धर्माच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर यांनी पाऊल टाकत त्यांनी मनुस्मृती जाळली, असं आव्हाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले. सनातन धर्म हा विकृत आहे हे बोलायला कोणीच घाबरला नाही पाहिजे, असंही आव्हाड म्हणालेत.

पुण्यात दादागिरी नेमकी कुणाची वाढली

आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी शिंदेंची भेट का घेतली याचा खुलासाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केला. पुण्यात दादागिरी वाढलीय, त्याचा जाब विचारायला आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो असल्याचं आव्हाड म्हणाले. पुण्यामध्ये गुंडाराज वाढत आहे, तो गुंडाराज नेमका कुणाचा वाढतोय. हे विचारण्याकरिता आपण एकनाथ शिंदे यांना भेटलो. मी विरोधी पक्षनेता आहे, हे विचारणं आणि त्यावर बोट ठेवणं माझं काम आहे. असं सांगताना आव्हाड म्हणाले, आमच्यात काय बोलणं झालं याची माहिती देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com