राष्ट्रवादी काँग्रेसची जळगावमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 'नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं? त्यांच्या सत्तेला ९ वर्ष झाली. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. नरेंद्र मोदींनी फोडाफोडीचं राजकारण केलं, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला. (Latest Marathi News)
राष्ट्रवादीच्या जळगावमधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, 'देशाच्या स्वातंत्र्याआधी ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिलं अधिवेशन खान्देशात झालं. या अधिवेशनाला महात्मा गांधी, पंडित नेहरू आले होते. खान्देशाचा इतिहास हा अभिमानाचा आहे'.
'एकेकाळी देशात उत्तम केळी खान्देशातून जात होत्या. या ठिकाणी उत्तम शेतीचा आदर्श मिळायचा. आता शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकंट आहे. जिल्ह्यात आता पाणी नाही, धरणात पाणी कमी आहे. दुहेरी पेरणी करूनही पिके पडली. दुष्काळामुळ शेतकरी संकटात आहे. माझी खात्री आहे की, परिस्थिती बदलू शकते. मात्र, भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही', अशी टीका शरद पवारांनी केली.
'देशाची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात गेली आहे. यवतमाळमध्ये गेल्या आठवड्यात वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खान्देशातील येथील लोक भीक मागत नाहीत. त्यांच्या कष्टाची किंमत मागत आहेत, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, ' मोदी साहेबंनी काय केलं? ९ वर्ष झालं. राष्ट्रीय पक्ष फोडले. शिवसेना-राष्ट्रवादी फोडली. सीबीआय, ईडी सारख्या यंत्रणा मागे लावल्या. अनेकांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं. भाजपने सत्तेचा गैरवापर केला. मोदींना विनंती आहे की, चुकीचं काम केलं असेल, त्यांची चौकशी करा. खोटे आरोप करू नका,अशी टीका देखील शरद पवारांनी केली .
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.