
सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : नवी मुंबईतून एका कंपनीला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर १ मध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी ८ अग्निबंब घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत ऐरोली सेक्टर १ मध्ये कंपनीला भीषण आग लागली आहे. ऐरोली येथे वीट भट्टी परिसराजवळ असणाऱ्या पेपर कंपनीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनाच्या दलाचे आठ वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यामुळे शेजारी असणाऱ्या २ मेकॅनिकल वर्कशॉप कंपन्यांना देखील आग लागली आहे. या आगीत एक महिला अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.