राज्यात 29 महापालिका निवडणुकांची घोषणा झालीय... त्यामुळे राजकीय भेटीगाठी,युती-आघाडी, जागावाटप आणि पक्षांतरच्या घटनांना वेग आलाय...अशातच पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला उधाण आलयं... मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेस नेमकं काय भूमिका घेणार, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय... त्यातच ठाकरेसेनेनं आमच्या युतीत काँग्रेस नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेत... त्यामुळे काँग्रेस मविआतून बाहेर पडणार का? असाही सवाल निर्माण झालाय....
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधीच महाविकास आघाडीत नव्या भिडूची गरज नाही, असं विधान करून राज ठाकरेंना युतीत समावून घेण्यासाठी विरोध केला होता...काँग्रेसला राज ठाकरे नेमके का नकोत?
राज ठाकरेंची आक्रमक हिंदुत्ववादी आणि मराठी भाषेच्या भूमिकेमुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झालाय... मराठीच्या मुद्द्यावरुन मारहाणीमुळे उत्तर भारतीय मतं दुरावण्याची काँग्रेसला भीती आहे... भोंग्याविरोधातील भूमिकेमुळे अल्पसंख्याक मतं दुरावण्याची शक्यता काँग्रेसला सतावतेय...
खरंतर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुक एकत्र लढवली होती.. त्यावेळी मुंबईतील 6 पैकी 4 तर राज्यात 30 जागांवर मविआचा विजय झाला होता..... मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून झालेल्या रस्सीखेचात मविआचा राज्यात सुफडा साफ झाला... अशातच महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं विरोधकांच्या फुटीचा सत्ताधारी पक्षांना फायदा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.