Buldhana : आदित्य ठाकरेंच्या 'त्या' आरोपांना शिंदे गटाच्या आमदाराचे जोरदार प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंनी 'शिंदे गट हे हिंदुत्वात फूट पाडून राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्नात आहे, असा आरोप केला आहे. त्या आरोपांना शिंदे गटाच्या आमदाराने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Eknath Shinde and aditya thackeray
Eknath Shinde and aditya thackeray saam tv

बुलडाणा : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील संपूर्ण सत्ताकारण बदललं आहे. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पाय उतार व्हावं लागलं आहे. तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेसमोर मोठं पक्ष संकट उभं टाकलं आहे. या पक्षसंकटावर मात करण्यासाठी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सभेमधून आदित्य ठाकरेंनी 'शिंदे गट हे हिंदुत्वात फूट पाडून राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्नात आहे, असा आरोप केला आहे. त्या आरोपांना शिंदे गटाच्या आमदाराने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Eknath Shinde and aditya thackeray
Video : मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' फोटोवरून जयंत पाटील यांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर आदित्य ठाकरे हे राज्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी एका सभेत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गट हे हिंदुत्वात फूट पाडून राज्यात दंगली घडविण्याच्या प्रयत्नात आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

संजय गायकवाड म्हणाले, 'शिंदे गटावर टीका करणाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ज्या मातोश्री बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार जगाला शिकविले. त्याच मातोश्रीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बैठक घेत आहात, हे बाळासाहेबांना चांगलं वाटत असेल का ? त्यामुळे त्यांनी आमच्यावर आरोप करू नये'.

Eknath Shinde and aditya thackeray
निती आयोगाच्या बैठकीत CM एकनाथ शिंदेंना शेवटच्या रांगेत स्थान, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार गायकवाड म्हणाले, 'तुम्ही नाही का गेले गेले शरद पवार यांच्या घरी ? तुम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नाही का भेटले ?.गेल्यावेळी आम्ही सुद्धा ६२ दिवस हॉटेलमध्ये बंद होतो, त्यावेळी ही मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. म्हणजे तुम्ही केलं तर चालतं ?'. आमदार गायकवाड पुढे म्हणाले, 'शिवसेनेमुळे जर आम्ही निवडून आलो असतो तर २८८ आमदार निवडून आले असते. जे आमदार निवडून येतात, त्यांची स्वत:ची पात्रता असते'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com