.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
- मुंबई, कोकण, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा
- कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
- सिंधुदुर्गमध्ये नदी नाल्यांचे पाणी वाढले; पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता
- विदर्भात वीजांचा कडकडाट; शेतकऱ्यांसाठी पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता
राज्यात सगळीकडेच मुसळधार पाऊस पडत आहे. आज कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर उत्तर कोकणामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भाला आज हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांसाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे आहे. २६ जुलैपर्यंत मुंबईत तुफान पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे गरज असल्यास मुंबईकरांनी घराबाहेर पडा असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात आज ऑरेंज अलर्ट आहे. तर संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता पण आता पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्याचा घाटमाथा, साताऱ्याचा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकच्या घाटमाथ्यावर देखील आज जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वैभववाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. याशिवाय वेंगुर्ले, मालवण, देवगड तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.
तसंच, भंडाऱ्यात रात्रभर सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील सातही तालुक्यात कुठे हलका तर, कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रात्रभर सुरू असलेला हा पाऊस पहाटेपर्यंत पडला. अनेक भागातील भातपीक लागवड थांबली होती, या पावसानं उर्वरित भागातील भातपिकांची लागवड आता जोमात होईल. या पावसानं शेतकरी चिंतामुक्त होईल, अशी आशा आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा पहापटेपासून जोर कमी झाला असून आता पावसाची रिपरिप सुरू आहे.
मुंबईसाठी हवामान खात्याने कोणता अलर्ट जारी केला आहे?
मुंबईसाठी २६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी असून गरजेपुरतेच घराबाहेर पडण्याचे आवाहन आहे.
कोकण आणि घाटमाथा जिल्ह्यांसाठी कोणता अलर्ट आहे?
कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात कसा पाऊस पडणार आहे?
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
या पावसामुळे कोणत्या भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते?
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवू शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.