
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुरमध्ये विखे पाटलांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. श्रीरामपूच्या माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह १० महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. हे सर्व जण आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास विहाणी, आशिष धनवटे, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, श्यामलिंग शिंदे, शशांक रासकर यांच्यासह जवळपास १० महत्वाच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. हे सर्व नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे सर्वजण भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
श्रीरामपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आमदार हेमंत ओगले आणि ससाणे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे श्रीरामपूरमध्ये काँग्रेसची ताकद कमी झाली असून भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. हे सर्व नेते गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी निर्णय घेत आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.