
महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा सुटला. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांनी मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे वक्तव्य केले. त्यांच्या या भूमिकेवर आता विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.
एकनाथ शिंदेवर दिल्लीतून दबाव आल्यानं त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा दावा सोडल्याची शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. तसंच, 'मुख्यमंत्रिपदाबाबत वेगळा निर्णय होऊ शकतो.', असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
'एकनाथ शिंदे आता काहीही बोलत असतील. त्यांना वरतून दबाव आला असेल. या दबावामुळेच त्यांनी आपाल निर्णय घेतला असावा. हा निर्णय त्यांनी आधी का नाही घेतला? इतके दिवस निर्णय घ्यायला का लागले?' असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. 'त्यांच्याजवळ बहुमत आहे. त्यामुळे यावर दिल्लीतून निर्णय घेतला जाईल.', असे देखील त्यांनी सांगितले.
तसंच, 'एकनाथ शिंदे इतके दिवस का बोलले नाहीत? महाराष्ट्रात पाशवी बहुमत मिळवल्यानंतरही सत्तास्थापनेचा घोळ संशयास्पद आहे. यांच्या युतीतच घोळ आहे. महाराष्ट्राला गॅसवर ठेवण्याचं काम निषेधार्थ आहे. भाजपच्या वरिष्ठांनी आतापर्यंत असेच निर्णय घेतले होते. इतर राज्यातही मुख्यमंत्रीपदासाठी अचानकच नवे चेहरे देण्यात आले. भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात. त्यामुळे तसंही काही होऊ शकतं.', असे नाना पटोले यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.