Maharashtra Politics: शरद पवार म्हणाले, तिसरी आघाडीमुळे मी घाबरलो… संभाजीराजेंनी महात्मा गांधींचं वाक्य म्हणत थेट प्रत्युत्तर दिलं...

Chhatrapati Sambhaji Raje On Sharad Pawar: 'इतर कोणी टिंगल केली असती तर खपवून घेतले नसते.', अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Politics: शरद पवार म्हणाले, तिसरी आघाडीमुळे मी घाबरलो… संभाजीराजेंनी महात्मा गांधींचं वाक्य म्हणत थेट प्रत्युत्तर दिलं...
yuvraj sambhaji chhatrapati and sharad pawarsaam tv
Published On

राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिंगल उडवली होती. 'तिसरी आघाडी ऐकून मी घाबरलो. आहो मला झोप लागत नाही.', असं म्हणत शरद पवार यांनी खिल्ली उडवली होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी महात्मा गांधींचे प्रसिद्ध वाक्य सांगत प्रत्युत्तर दिलं आहे. 'इतर कोणी टिंगल केली असती तर खपवून घेतले नसते.', अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवारांना उत्तरं दिलं.

Maharashtra Politics: शरद पवार म्हणाले, तिसरी आघाडीमुळे मी घाबरलो… संभाजीराजेंनी महात्मा गांधींचं वाक्य म्हणत थेट प्रत्युत्तर दिलं...
Maharashtra Politics : विधानसभेआधी शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता लवकरच शिवबंधन बांधणार? ठाकरेंची ताकद वाढणार!

छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले की, 'पवारसाहेब जेष्ठ आहेत. त्यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे. इतर कोणी केली असती तर खपवून घेतली नसती. माझ्यासाठी पवार यांनी टिंगल करणं नवीन नाही. अगोदर ही त्यांनी टिंगल केली होती. महात्मा गांधी यांच्या विचाराने आम्ही चाललो आहेत. आधी दुर्लक्ष करतील, मग टिंगल करतील, मग ते तुमच्याशी लढतील नंतर तुम्ही जिंकता.', हे महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध वाक्य सांगत छत्रपती संभाजीराजेंनी शरद पवारांना उत्तर दिलं.

Maharashtra Politics: शरद पवार म्हणाले, तिसरी आघाडीमुळे मी घाबरलो… संभाजीराजेंनी महात्मा गांधींचं वाक्य म्हणत थेट प्रत्युत्तर दिलं...
Maharashtra Politics: PM मोदींच्या जागी मी असतो तर मी देखील हेच केलं असतं; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

मराठा आरक्षणासंदर्भातील शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजेंनी सांगितेल की, 'शरद पवारसाहेब वेळोवळी आरक्षणबाबत सांगत असतात. मला महिती आहे जे १० टक्के आरक्षण वाढवून दिलं आहे त्यात सर्वांच्या सह्या आहेत. पण मराठा समाजाला मान्य नाही. ७५ टक्के हवं तर पवारसाहेबांनी द्यायला हवं होतं. राजकीय इच्छाशक्ती हवी, जातीय जनगणना व्हायला हवी.'

Maharashtra Politics: शरद पवार म्हणाले, तिसरी आघाडीमुळे मी घाबरलो… संभाजीराजेंनी महात्मा गांधींचं वाक्य म्हणत थेट प्रत्युत्तर दिलं...
Maharashtra Politics: ...म्हणून लक्ष्मण पवारांची निवडणुकीतून माघार, धनंजय मुंडे यांचा पलटवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com