
सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये रिमझिम पाऊस सुरू असला, तरी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा-भामा खोऱ्यातील तीन अशा एकूण नऊ जलाशयांतील पाणीसाठा अत्यंत खालावला असून, जुलै महिना सुरू असतानाही ही धरणे जवळपास कोरडी आहेत. दरवर्षी याच कालावधीत ३० ते ३५ टक्के भरलेली असणारी धरणे यंदा रिकामी असल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये खरीप हंगाम, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तरच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.