

रेल्वे रूळ ओलांडताना तरुणाचा अपघात झालाय.
कांदिवली-बोरिवली दरम्यान विरार कडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर तरुणाचा अपघात
विरारकडे जाणारी धीमी लोकल 45 मिनिटांपासून उभी
पुणे पोलिसांनी निलेश घायवळ प्रकरणात घेतला होता सचिनचा शोध
परंतु सचिन घायवळ देखील पुणे पोलिसांना सापडला नाही
निलेश घायवळ अडचणीत सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबच फरार असल्याची माहिती
नक्षल निर्मूलन मोहीम, अतिसंवेदनशील दुर्गम भागांत सातत्याने पोलीस शिबिरे (कॅम्प) स्थापन झाल्यामुळे वाढलेला पोलिसांचा प्रभाव, नक्षलवाद्यांची अमानुष, निराधार विचारधारा, त्यांचे शोषण, अत्याचार, बाहेरील नक्षलवाद्यांकडून होणारा भेदभाव आणि स्थानिक आदिवासींवर होणारा हिंसाचार यामुळे कंटाळून पीएलजीए मिलिटरी कंपनी नंबर-१ चे उप-कमांडर, पीएलजीए मिलिटरी कंपनी नंबर-१ चा सदस्य, उत्तर ब्युरो टेक्निकल टीमचा सदस्य (डीवीसीएम), माड डिव्हिजन स्टाफ टीमचा सदस्य (एसीएम), पार्टी सदस्य, कुतुल एलजीएस सदस्य, जनताना सरकार सदस्य आणि मिलिशिया सदस्य अशा एकूण १६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतर सुद्धा पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला
पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली माहिती
माजी खासदार संजय काका पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत
विधानसभा निवडणुकीच्या नंतर संजय काका पाटील पहिल्यांदाच कार्यकर्ता संवाद मेळावा प्रसंगी पुन्हा सक्रिय
माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते संजय काका पाटील यांची घोषणा.. " कार्यकर्ता हाच माझा पक्ष" सांगली जिल्ह्यातील तासगाव येते कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून घोषणा.
कार्यकर्ता हाच माझा पक्ष आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका निवडणुकीत विकास महाआघाडी तर्फे निवडणूक लढवणार.
राज्यभरात गेले आठवडाभर सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळच्या बनावट पासपोर्ट प्रकरणानंतर घायवळ बंधूंकडून व्यवस्थेला बटीक बनवण्याचा प्रकार समोर आलाय आहे.
निलेश बन्सीलाल घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न, आर्म्स ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी नाकारला असताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी २० जून २०२५ रोजी अधिकृत शस्त्रपरवाना दिल्याच उघड झालं आहे. घायवळ टोळीचा निलेश घायवळ याच्यानंतर सचिन घायवळ म्होरक्या होता.
नवी मुंबई रबाळे अपहरण प्रकरणात अपडेट
मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन बेलापूर सत्र न्यायालयाने नाकारला
मिक्सर चालक प्रल्हाद कुमार यांच्या अपहरणप्रकरणात मुख्य आरोपी दिलीप खेडकर फरार आहे.
सहआरोपी मनोरमा खेडकर हिला १३ तारखे पर्यंत अंतरीम जामीन झाला आहे.
तर तिसरा आरोपी चालक प्रफुल साळुंखे अटकेत आहे.
गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून काही दिवसापूर्वी सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता मात्र आता सोन्याच्या दाराने नवा उच्चांक केला असून दहा ग्रॅम साठी आता सोन्याचा दर हा जीएसटी सव्वा लाखाच्या पार गेला आहे सोन्याचा दर 10 ग्राम साठी 1 लाख 25 हजार 763 रुपये झाला असून चांदीचा किलोचा दर हा एक लाख 53 हजाराच्या वर गेला आहे
बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी तालुका केज येथे सहा दिवसा पासून धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्रीताई राठोड या उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांच्या उपोषण आणि मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या आवारात बैलगाडीवर पेट्रोल टाकून बैलगाडी पेटवून दिली. आंदोलकांनी कोरडेवाडी येथील साठवण तलाव मंजूर करावा. ज्ञानराधा बँकेच्या ठेवी परत देण्यात याव्या. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टरी 50 हजार रु नुकसान भरपाई देण्यात यावी. या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांस १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी करण्यात असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत
या आदेशात पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४८ व महामार्ग क्र.४ कडे जाणाऱ्या मार्गिकेवर (जुना पुणे- मुंबई महामार्गावर) किवळेकडून कात्रजकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.
दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराची अकोल्यात धिंड काढण्यात आली आहे.... अकोल्यातल्या वाशिम बायपास परिसरात तरुणांच्या दोन गटात राडा झाला होताय.. या राड्यादरम्यान दगडफेक, लाथा बुक्क्यांनी मारहाण, तसेच काठीने एकमेकांना मारहाण झाली होती. त्यानंतर आता अकोला पोलिसांकडून या गावगुंडाचा रोड-शो करण्यात आलाय.. प्रमुख आरोपी असलेला स्वप्निल उर्फ लाल्या पालकर याची आज धिंड काढण्यात आली आहे.. अकोल्यातल्या वाशिम बायपास परिसरात या गुन्हेगाराची दहशत होती. त्याच ठिकाणी पोलिसांकडून गुन्हेगारांवर वचक निर्माणकरण्यासाठी या गावगुंडाची धिंड काढायला सुरुवात केलीए..
ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन..यावेळी खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले,ठाकरेंच्या शिवसेकडून ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी आणि कर्जमाफी करण्यात यावी या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.या आंदोलनात खासदार अरविंद सावंत देखील प्रामुख्याने उपस्थित होते.. तसेच आमदार गजानन लवटे आणि मोठया संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते..यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली....
पुणे – वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राड्याला आता नवा नाट्यमय ट्विस्ट मिळालाय. या प्रकरणात आमदार बापू पठारे आणि त्यांच्या समर्थकांना झालेल्या धक्काबुक्कीची चर्चा रंगली असताना, “मार खाणारा सचिन पठारे मी नाही” असं म्हणत ॲड. सचिन पठारे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं आहे.
शनिवारी लोहगाव येथील गाथा लॉन्स मध्ये आमदार बापू पठारे एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांचं आणि बंडू खांदवे यांचं शाब्दिक चकमकीत रूपांतर झालं. या वादानंतर दोन्ही गटातील समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आणि काहींना मारहाण झाल्याची माहिती मिळाली. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी बंडू खांदवे यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाची हजेरी
गेल्या ७ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुण्यात दमदार पुनरागमन
हवामान विभागाने वर्तवला आहे पुण्यासह अनेक जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज
शहरातील मध्यवर्ती भागात आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदउद्दीन ओवेसी यांची सभा उद्या अहिल्यानगरमध्ये होणार आहे. याआधी 29 सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर 30 सप्टेंबरची नियोजित सभा रद्द करण्यात आली होती. त्या घटनेनंतर पुन्हा एकदा ओवेसींची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तसेच काही सामाजिक कार्यकर्ते AIMIM मध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतचं 29 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यानंतर आणि पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेकांना अटक झाल्यामुळे शहरात एकप्रकारे तणावपुर्ण शांततेचं वातावरण निर्माण झाले होते.
विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना
उड्डाण योजनेचा लाखो लोकांनी लाभ घेतला
भारतात १६० पेक्षा जास्त विमानतळ
तरुणांना जास्तीत जास्त रोजगार देण्यावर भर
काही जणांनी या विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला
घोटाळे करुन विकास थांबवला
आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी पीएम नरेंद्र मोदींनी संबोधित केले. त्यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आशियातील सर्वात चांगली कनेक्टिव्हिटी म्हणजे हे विमानतळ. मुंबईला अखेर दुसरं विमानतळ मिळालं. मेट्रोसाठी काम करणाऱ्याच्या सर्वांचे अभिनंदन. मुंबईच्या पोटातून मेट्रोची निर्मिती.यामुळे मुंबईकरांचा खूप वेळ वाचणार आहे.
देश आणि राज्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प
६ वर्षात रखडलेलं काम पूर्ण झालं
नवी मुंबई विमातळामुळे देशाचा जीडीपी वाढणार
लवकरच वॉटर टॅक्सी होणार सुरु
वॉटर टॅक्सूमुळे थेट गेट वे ऑफ इंडियाला जाता येणार
राज्याचा विकास वेगाने होत आहे
विकासाचे आणखी खूप टप्पे गाठायचे आहेत
विविध विकासकामांचा पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन करणार
नवी मुंबई विमानतळामुळे फक्त मुंबई, नवी मुंबई नव्हे तर देशातील आर्थिक विकासाला चालना
नवीन मुंबई विमानतळामुळे प्रवास सुखकर होणार
४ महत्त्वाच्या प्रकल्पांचं आज उद्घाटन
नवी मुंबई विमानतळाची उभारणी सोपी नव्हती, भूसंपादनापासून ते विमानतळ उभारण्यासाठीची प्रक्रिया खूप मोठी होती- अजित पवार
अँकर-: धुळ्यात अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे यामागणीसाठी बंजारा समाजाचा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला आहे, धुळ्यातील अग्रेसन पुतळा चौकापासून या मोर्चाची सुरुवात झाली, यावेळी मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमातळाचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळाची पाहणी केली.
गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे मराठवाडा, सोलापूर यासारख्या अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकरी संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहचली नाही. शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू झाला आहे. त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले. शेतकऱ्याना तत्काळ मदत मिळावी यासाठी ठाण्यात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
अंबरनाथ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. नगरपंचायतीच्या मुख्य सभागृहात ही सोडत काढण्यात आली असून, या वेळी अनेक इच्छुक उमेदवार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोडतीची प्रक्रिया पाहिली. पारदर्शकतेसाठी या सोडतीचे थेट प्रक्षेपण स्थानिक केबल टीव्हीवर करण्यात आले.या सोडतीनुसार नगरपंचायतीत एकूण २९ प्रभाग असून, त्यापैकी २८ प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक आणि २९व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. एकूण ५९ नगरसेवक या निवडणुकीत निवडून येतील.अंबरनाथ नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदासाठी महिला खुला प्रवर्ग घोषित झाला आहे. त्यामुळे शहरात महिला नेतृत्वाला वाव मिळणार आहे.आरक्षण जाहीर होताच अंबरनाथमधील राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
प्रवाशांना रात्रीच्या वेळी लुटणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. फैजान मोहम्मद गौस शेख असे रिक्षा चालकाचे नाव असून वानवडी पोलिस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना काही व्यक्ती चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी हडपसर भागात आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याठिकाणी पोहचताच तिथे असलेल्या रिक्षा चालकाने रिक्षा चालू करून तिथून पळून जाण्याचा तयारीत होता. पोलिसांनी फैजान मोहम्मद गौस शेख व दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले
350 वर्षापासून उपेक्षित आणि वंचित राहिलेली महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णोध्दार संदर्भात मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत साताऱ्यातील संगम माहूली येथील येथील दुर्लक्षित महाराणी ताराराणी समाधी आणि घाटाचा विकासासाठी 133 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही समाधी ज्या ठिकाणी होती तो भाग दुर्लक्षित होता त्याचबरोबर या समाधीच्या ठिकाणी जे खोदकाम करण्यात आलं होतं त्यातून निघालेले सर्व दगड हे गावातील एका मंदिराच्या बाजूला ठेवण्यात आले होते. या समाधीचा जिर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी होती त्याचबरोबर संगमहुलीचा घाटाचा विकास व्हावा असं देखील गावकऱ्यांचं म्हणणं होतं . मंत्रिमंडळाकडून
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी येथील सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर लावण्यात आलेल्या काँक्रीट बॅरिगेटवर धडकून भीषण अपघात . अपघातात कारमधील चार जन गंभीर जखमी . जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू . महामार्ग पोलिसांनी दंड वसूल करण्यासाठी लावलेल्या बॅरिगेट्सला कार धडकली.
जरांगे पाटलांच्या पायाखाली लोळणं घालता? जरांगे पाटलांनी मिळवलं
बंजारा समाजाच्या भावना जावुन घेण्यासाठी सरकारने स्व:ताहुन आल पाहीजे,विचारल पाहीजे
मुंबई शिवाजी पार्कवर 17 तारखेला बंजारा समाज धडकणार -
यावर्षीची दिवाळी शिवाजी पार्कवरच साजरी करणार -
गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजाचा आरक्षणासाठी लढा, मुख्यमंत्र्यांनी आमचा अंत पाहू नये -
माजी आमदार हरिभाऊ राठोड यांचा सरकारला इशारा -
धाराशिव मध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा,माजी आमदार हरिभाऊ राठोड मोर्चात सहभागी -
नाशिक जिल्ह्याती सर्वात मोठी नगर परिषद असलेल्या मनमाड नगर परिषदेच्या १६ प्रभागांसाठी आज सोडत काढण्यात आल्या,प्रभागातील ३३ जागांसाठी काढण्यात येऊन त्यातील १७ जागा महिलांसाठी राखीव असून ,अनूसूचित जातीसाठी ९,अनूसुचित जमातीसाठी २ तर नागरीकांच्या मागासप्रर्वगासाठी ९ जागा आरक्षित झाल्या असून या आरक्षणामुळे अनेक दिग्गज माजी नगसेवकांचे पत्ते कट झाले आहे.आरक्षण सोडतीवर उद्यापासून हरकती नोंदविण्यात येणार आहे.आधिच मनमाड नगरपारिषदेचे थेट आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्याने या निवडणूकीत चांगलीच रंगत येणार आहे.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथे भरलेल्या जौतोबा महाराज यात्रे निमित्त आज सकाळ पासून यात्रा समिती तर्फे कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी नाशिक,जळगाव,धुळे येथिल कुस्तीपटूनी सहभाग घेतला आहे सुरवातील लहान गटाच्या स्पर्धां पासून सुरुवात करण्यात आली आहे.कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतून कुस्ती शौकींनानी गर्दी केली आहे.
हैदराबाद गॅजेट नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करा व मागणी
आरक्षण आंदोलनात महिलांच पारंपारिक वेशभूषा करत मोठ्या प्रमाणात सहभाग
तर झाडांच्या फांद्यांच्या पोशाख करत आंदोलकांने वेधलं लक्ष
आमचा समाज मागास आहे हे सरकारला दाखवण्यासाठी अशी वेशभूषा केल्याचं सांगितलं, आरक्षण देऊन सरकारने न्याय करावा अशी मागणी
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत हद्दीतील खाज्याजी नाईक मुलांच्या निवासी आश्रमशाळेत गोवरचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. एकूण 15 हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण प्राथमिक माहिती समोर आली असून, यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. विद्यार्थ्यांना त्रास जाणवल्याने त्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा पुढील तारीख देण्यात आली आह. आता १२ नोव्हेंबर रोजी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह.. याबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. आज निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याकडून जिल्हा कारागृहात असलेल्या बंद्यांचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या आरोपीचे वकील राहुल आघाव यांनी केला आहे. यासंदर्भात बंद्यांनी मला लेखी स्वरुपात कळवले आहे असा दावा देखील वकील राहुल आघाव यांनी केला आहे. धर्म परिवर्तनास तयार न झालेल्या कैद्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या अन्नातून विष देऊ अशी ही धमकी दिली गेली, तर न्यायाधीश माझे चांगले मित्र आहेत तुम्ही धर्म परिवर्तन केलं तर तुम्हाला या केसमधुन बाहेर कसं काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही त्यांचे वाक्य आहेत असा आरोप वकील राहुल आघाव यांनी पत्रकार परिषदेतुन केला आहे.
तर यांच्याविरोधात उच्च न्यायालयात मी याचिका दाखल करणार आहे आणि महासंचालक यांच्याकडे देखील तक्रार करणार आहे अशीही माहिती राहुल आघाव यांनी दिली आहे.
भोकर मतदार संघावर अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण ह्या या भागाच्या आमदार आहेत पण अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सरेगाव धनज, खांबाळा,पाथरड कडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. जवळपास दोन ते तीन फुटापर्यंत खड्डे पडले असुन या भागातील विद्यार्थी वृद्ध महिला व दूध घेऊन जाणाऱ्याशेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील नागरिकांना मणक्याचे व सांधेदुखी सारखे आजार झाले आहेत. अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी आता आमरण उपोषण सुरु केले आहे.मागील दोन दिवसापासून सरेगाव पाटी येथे ऊपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीवर चार गावच्या ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे
येरवडा परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या सावटाखाली आला आहे. रविवारी सकाळी लक्ष्मीनगर भागात तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येत शस्त्रांसह रस्त्यावर धुमाकूळ घातला. आरडा-ओरडा, धमक्या आणि वाहनांची तोडफोड करत त्यांनी परिसरात अक्षरशः अराजक माजवले.हल्लेखोरांनी हातात कोयते, काठ्या आणि तलवारी घेत नागरिकांना घाबरवत अनेक दुचाकी, चारचाकी व दुकानांवर दगडफेक केली. अचानक उफाळलेल्या या हिंसक प्रकारामुळे नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद करून स्वतःचा जीव वाचवला. “हे टोळके गेल्या काही दिवसांपासून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. रात्री उशिरा फिरून लोकांना धमकावणे आणि विरोध करणाऱ्यांवर शस्त्रांनी हल्ला करणे” हे त्यांचे रोजचेच झाले आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई येथील मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या बीडच्या घोसापुरी गावातील संजय पवार यांच्या कुटुंबाला माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी तीन लाख रुपयाची मदत केली. यावेळी व्हिडिओ कॉल वरून पवार कुटुंबाशी संवाद साधत कुटुंबाला धीर दिला तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली..यावेळी काळजी करू नको काका म्हणून तुझ्या पाठीशी आहे. असा शब्द दिला.. मराठा सेवक अशोक रोमन यांनी ही तीन लाख रुपयाचा धनादेश कुटुंबाला सुपूर्द केला. या अगोदर माजी मंत्री आ तानाजी सावंत यांनी शंभर कुटुंबाला मदत केली आहे.
शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण
महिलेची प्रकृती गंभीर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी महिलेला बेदम मारले
नेकनूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू
संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून जेरबंद करा पीडित कुटुंबाची मागणी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अर्बन सेलचे राज्यसंघटक विनोद देशमुख यांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी केली अटक
व्यवसायिक मनोज वाणी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संघटक विनोद देशमुख यांना पुन्हा शहर पोलिसांनी अटक केली असून मनोज वाणी यांच्या रामदास कॉलनीतील कार्यालयावर हल्ला करून दरोडा तसेच जीव घेण्याच्या धमक्या दिल्या प्रकरणे दाखल गुन्ह्यात विनोद देशमुख रामानंदनगर पोलिसांनी अटक केली होती त्यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली होती .आता शहर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल असून त्यांना शहर पोलिसांनी देखील अटक केली आहे
- कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी मिळावी, यासाठी महसूल सेवक संघटनेचं आंदोलन
- गावगावातील सर्वे, पंचनामा, आणि महसूल विभागाच्या गाव स्तरावरील कामांवर परिणाम
- रविंद्र बोदेले, योगेश शेळमाके यांचं आमरण उपोषण सुरु
- शासकीय चतुर्थ श्रेणीत दर्जा मिळावा, या मागसाठी कामबंद आंदोलन
- १३ सप्टेंबरपासून २२ दिवस केलं साखळी उपोषण
- विदर्भातील बहुतांश कोतवाल संघटना कामबंद आंदोलनात सहभागी
महापालिकेतील कंत्राटी कामगारांना मागील तीन महिन्यांपासून पगार मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक विवंचनेमुळे या थकीत वेतनासाठी नारळीबाग येथील महाराणा एजन्सीच्या कार्यालयावर कामगारांनी धडक दिली. या वेळी एका कामगाराच्या पत्नीने बाटलीमधून पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंत्राटदार आणि इतर कामगारांनी समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला.
जळगाव जिल्हा बँकेची ऐतिहासिक ‘दगडी बँक’ इमारत विक्रीस काढण्याच्या संचालक मंडळाच्या निर्णयावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बँकेचे चेअरमन संजय पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात या मुद्यावरून थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
नांदेड शहरातील पीरबुऱ्हाण नगर येथून एका दीड वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते. पिरबुऱ्हाण नगर येथील एका मस्जिदी बाहेरून दोन आरोपींनी या बालकाचे अपहरण केले होते.. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि भाग्यनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पल्सर गाडीवर आलेल्या दोन युवकांनी त्या बालकाला पळवले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बाळाची सुखरूप सुटका केली. 27 वर्षीय मोहम्मद अमीर आणि त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल या दोघांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आज अटक केली.त्या बाळाची सुखरूप सुटका केली.मोहम्मद आमीर हा गवंडी काम करतो .. त्याचा मित्र मोहम्मद इस्माईल हा सराईत गुन्हेगार आहे .. हे दोघे नांदेड शहरातील खुदबई नगर येथील राहीवाशी आहेत ... त्यांनी या बालकाचे अपहरण का केले होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.या प्रकरणाचा तातडीने तपास केल्या बद्दल पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी भाग्यनगर पोलिसांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलें .
महाराष्ट्रामध्ये अनेक जुन्या परंपरा, संस्कृती लोप पावत चालल्या आहेत.. त्यातीलच एक उत्सव म्हणजे भुलाबाई.. भुलाबाई उत्सवाची परंपरा आजही ग्रामीण भागामध्ये जपली जात आहे.. भुलाबाई उत्सव हा विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील महिला मुलींचा एक पारंपरिक सण आहे, जो भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो, या उत्सवात भुलाबाई ही पाहुणी म्हणून एका घरात येते आणि या काळात टिपऱ्या खेळणे, पारंपरिक गाणी म्हणणे व प्रसाद वाटणे असे कार्यक्रम केले जातात.. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अनेक वर्षापासून ही परंपरा जपली जात आहे, याही वेळी शाळेतील सर्व शिक्षीकांनी सहभागी होत उत्सव साजरा केला, दप्तरमुक्त शाळा या विशेष उपक्रमांतर्गत साजरा करण्यात आलेल्या पारंपरिक कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला...
हरभरा डाळीच्या दरात घट झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घट झाली आहे
-गेल्या वर्षी घाऊक बाजारात एक किलो हरभरा डाळीसाठी 85 ते 94 रुपये दर होता तर किरकोळ बाजारात 100 रुपये किलो इतका दर होता
-यंदा हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दरात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घट झाली आहे
-सध्या हरभरा डाळीचा दर प्रतवारीनुसार 72 ते 75 रुपये प्रतिकिलो आहे
- लालन किशोर सिंग यांनी ही याचिका दाखल केली असून कोर्टासमोर अंतिम सुनावणी पार पडली
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कशाच्या आधारावर सुरक्षा पुरविले जाते आणि या सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च होतो याची माहिती मागणाऱ्या याचिकेवरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने राखून ठेवला
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कायद्यानुसार नोंदणी झालेली नाही त्यामुळे त्यांना सार्वजनिक निधीतून सुरक्षा पुरविली जाऊ शकत नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे
- याचिकाकर्ते लालन किशोर सिंग यांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी गृह विभागाला आरटीआय अंतर्गत अर्ज सादर करून ही माहिती मागितली होती
- विशेष शाखा पोलीस उपायुक्तांनी या संदर्भात माहिती दिली जाऊ शकत नसल्याचे सिंग यांना कळविले
- त्यानंतर प्रथम व द्वितीय अपीलामध्ये त्यांची मागणी मंजूर झाली नाही
- त्यानंतर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली
40 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या पूर्ण व्हाव्या, यासाठी कालपासून भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्तांनी आरपारची लढाई आंदोलन सुरू केलं आहे. काल दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजताच्या सुमारास तीन महिला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालया समोरील कडुनिंबाच्या झाडावर चढल्यात. यामुळं पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची चांगलीचं तारांबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पुनर्वसन मंत्री त्यांच्याशी तातडीची बैठक लावून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्या ही मागणी रेटून धरण्यात आली. जिल्हाधिकारी सावन कुमार, अप्पर जिल्हाधिकारी (पुनर्वसन) लीना फडके यांनी आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून यावर तातडीनं बैठक लावण्याचं आश्वासन देत उद्या सर्व प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक लावण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि तब्बल सहा तासानंतर झाडावर चढलेल्या महिला झाडावरून खाली उतरल्यात.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या 52.हजार 110 लाभार्थ्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली यामध्ये 3 हजार 500 लाभार्थी लाडक्या बहिणी 65 वर्षावरील आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक असल्याचे उघडकीस आले यातून 48 हजार 500 हून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत असे असले तरी त्या पात्र महिलांना गेल्या तीन हप्त्यांपासून वंचित राहावे लागत आहे. आता ई- केवायसीच्या नावाने महिलांची पुन्हा फरफट होत असल्याचे चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळते.
- राज्य अन्न व औषधी विभागाची सर्व किरकोळ औषधी विक्रेत्यांस सूचना
- कफ सिरप मुळे मध्य प्रदेशातील बालकांच्या झालेल्या मृत्यूनंतर राज्य अन्न व औषध विभागाचा महत्वपूर्ण निर्णय
- बाल रुग्णांसाठी 'सिरप' प्रवर्गातील औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री केल्यास कठोर कारवाईचा अन्न व औषध विभागाचा इशारा
- औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम 1945 अंतर्गत अनुसूची एच,अनुसूची एच-1 आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वरच करण्याच्या सूचना
अमरावती जिल्ह्यातील ब्रिटिश कालीन शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (VMV College) येथे परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. प्रशासनाकडे तक्रारी करूनही तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत महाविद्यालयात आंदोलन केले आहे.
प्राध्यापक शिवानंद कुमार यांनी परीक्षा फॉर्म बाबत जाब विचारणाऱ्या नाराज विद्यार्थ्यांना “संस्था सोडा” असे म्हटल्याच आणि एका विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी संचालक सतीश मालोडे उपस्थित असल्याचे सांगितले जाते.
विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रक, ऑनलाइन फॉर्म पोर्टल आणि पारदर्शक प्रक्रिया यांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेतकरी यावर्षी अस्मानी आणि नैसर्गिक संकटात सापडलाय. अतिवृष्टीने हजारो हेक्टरमधील कापणीयोग्य भातपीक वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसात जमीनदोस्त झालं. त्यानंतरं आता तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेकडो हेक्टरमधील भातपीक हा रोग फस्त करीत आहेत. महागडी औषध फवारणी केल्यानंतरही भातपीक वाचविण्यात शेतकरी यशस्वी ठरताना दिसत नाही. त्यामुळं अगोदर अतिवृष्टी आणि आता तुडतुडा रोगाच्या प्रादुर्भानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि नैसर्गिक संकटात सापडा आहे.
प्लॅस्टिकमुक्त अमरावतीसाठी महानगरपालिका प्रशासनाने मोठी कारवाई करत कडवी बाजार परिसरातून बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा तब्बल चार ट्रक साठा जप्त केला आहे.
ही मोहीम नवनियुक्त महापालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. अतिक्रमण व स्वच्छता विभागाच्या संयुक्त पथकाने ही तपासणी मोहीम केली.
तपासणीदरम्यान व्यापाऱ्यांकडे बंदी घातलेल्या पिशव्या, कप, प्लेट्स आणि अन्य प्लॅस्टिक साहित्य आढळले. पूर्वसूचना देऊनही वापर सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध मनपाने कठोर कारवाई केली आहे.
वाशीमच्या मालेगांव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे वेगवेगळ्या ठिकाणी गावठी दारू विक्री करणाऱ्यावर एसडीपीओच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली. या कारवाई 1 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करत 5 जणांवर पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाशीम एसडीपीओ नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगांव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरकिन्हीं येथे 5 ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात मोहमाचं हातभट्टी दारू, सडवा बाळगणारे आणि विक्री करतांना मिळून आले. याप्रकरणी मिळून आलेली हातभट्टी दारू 105 लिटर, 855 लिटर मोहमाचा सडवा ,1 मोबाईल ,1 मोटर सायकल असा 1लाख 68 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.तसेच गावठी हातभट्टी दारु आणि मोहामाच सडवा बाळगणारे आणि विक्री करणाऱ्या आरोपी 5 आरोपी विरुद्ध मालेगांव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलं आहे. ही कारवाई एसडीपीओ नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दिनेश शिरेकार आणि त्यांच्या पथकाने केली.
८ दिवसानंतर सुद्धा गौतमी पाटील ने पोलिसांकडे जबाब नोंदवला नाही
१ तारखेला हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली असताना सुद्धा गौतमी पाटील उपस्थितीत नाही
पोलिसांचा आदेश झुगारुन गौतमी पाटील चे "शो" दणक्यात सुरू
गौतमी पाटील ला कोणाची भीती वाटते? पोलिसांकडे हजर राहायला सुद्धा गौतमी पाटील ने टाळलं
यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबांनाही ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर या रेशन कार्डधारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा रेशनकार्डधारकांचे धान्य बंद करण्याच्या सूचना होत्या तूर्त या प्रक्रियेत राशनकार्डला ई-केवायसी करण्याची वाढीव मुदत नसली तरी अपडेशन प्रक्रिया सुरू आहे मात्र पुढील काळात अशा रेशन कार्डधारकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरुवात झालेला श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची आश्विन पौर्णिमेच्या विविध कार्यक्रमाने सांगता करण्यात आलीय.पंधरा दिवस सुरू असलेल्या महोत्सवानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली. सोलापूर येथील मानाच्या काट्या आल्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले तर राञी उशीरा मानाच्या काठ्यासह तुळजाभवानी मातेचा छबिना करण्यात आला आणि परंपरेचा जोगवा मागून या महोत्सवाची सांगता करण्यात आली.यावेळी मंदिरात लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.
सांगली जिल्ह्यातील मिरज येते मुस्लिम समाजाच्या भावना दुखानारे वक्तव्य करणाऱ्या 16 वर्षीय मुलाला पोलिसांनी तात्काळ अटक करून कारवाई केली आहे.
या घटनेने मिरज येथील शास्त्री चौक येते जमाव जमला होता..याच दरम्यान राजकीय पुढाऱ्यांचे ही फलक फाडले गेले आहेत.काहीजण भावना दुखावणार्या मुलाच्या घरावर चाल करून गेले होतें. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन जमाव पांगवला ,पोलीस स्टेशन आवारात समाजाकडून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जमावाला शांत करत ..कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.सद्या तनाव पूर्ण निवळला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केली आहे.
ज्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं.
मात्र उद्या उद्घाटन तरी देखील निमंत्रण पत्रिकेवरती विमानतळाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख.
दिबा पाटील यांच्या नावाचं कुठेही उल्लेख नाही.
विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी अनेक भूमिपुत्रांनी केले होते आंदोलन
महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर समिती निर्माण करणार
या समितीत पालकमंत्री व दोन्ही पक्षांचे नेते असणार, सोबतच जिल्ह्यातील आमदार व इतर ही असणार…
जिल्हा पातळीवरील समिती पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील निवडणुकींच्या अनुषंगाने अहवाल तयार करणार…
या अहवालात जिल्ह्यातील परिस्थिती, महायुती आणि महायुतीअंतर्गत असलेल्या पक्षाची ताकद आणि परिस्थिती याचा ही आढावा असणार
तसेच ज्या जिल्ह्यात महायुती अंतर्गत वादाची सविस्तर माहिती मांडणार
हा संपूर्ण अहवाल, आढावा जिल्हा समन्वय समिती राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार
राज्य सरकारकडे अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील
कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल…
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई मेट्रो ३ आज पूर्णपणे सुरू होणार आहे. मोदी काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.