Maharashtra Live News Update: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५, आज कार्तिकी एकादशी, तुळशी विवाह, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने ऊर भरून आलंय : विखे-पाटील

श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झालंय.. 40 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती झाल्याने माझं उर भरून आलंय अशी भावनिक प्रतिक्रिया मंत्री विखे पाटलांनी दिलीये.. तर सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना, सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर आनंदच होईल असे सूचक विधान विखे पाटलांनी केलंय.

हिवाळी अधिवेशनापूर्वी कंत्राटदारानी थकीत बिल न मिळाल्याने काम बंद

ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे चर्चांना आला वेग

ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग दाटलेत.

गोळीबार करणाऱ्या मेहताब दादाला अटक, पाच दिवसांची पोलिस कोठडी

नाशिकच्या मालेगाव शहरात लहान मुलांच्या वादातून झालेल्या किरकोळ वादातून गोळीबार करुन घरात घुसून मारहाण करणा-या मेहताब दादा याला अटक करण्यात आल्या नंतर आज संध्याकाळी मालेगाव कोर्टात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे,मेहताब दादा याने दोन राऊड फायर केल्या होत्या तर त्याच्या साथिदारांकडे हत्यारे सापडली होती.या प्रकरणात फरार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामस्थ आक्रमक, रोखला महामार्ग

बिबट्यांच्या हल्ल्या विरोधात शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून बेल्हे जेजुरी महामार्ग रोखत महामार्गावर टायर पेटवून दिलेत. बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय मागे हटणार नाही आमचं लेकरांना वाचवा अशी हाक देत बिबट्यांच्या हल्यांचा थरारक अनुभव ग्रामस्थांनी व्यक्त केला.

बी टी कवडे रस्त्यावर पुन्हा कोयत्याने गाड्या फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

कोयता गॅंग पुन्हा सक्रिय

पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्या लोकांसमोर येऊन फोडल्या

टेम्पो टू व्हीलर अशा एकूण दहा गाड्यांची तोडफोड

मुंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रकार

सीसीटीव्ही मध्ये सर्व प्रकार कैद

नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

Pune : पुण्यात कोरेगाव पार्क अपघात प्रकरणी अपडेट; तिसऱ्या तरुणाचा मृत्यू 

पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणी अपडेट

अपघातात तिसऱ्या तरुणाचा सुद्धा मृत्यू

रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कुशवंत टेकवाणी चा मृत्यू

पहाटे ४.५५ वाजता भरधाव वेगात असलेल्या वाहनाचा मेट्रो पिलर ला धडकून झाला होता अपघात

बेळगांवात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन

बेळगांव जिल्ह्यातील गुरलापूर येथे ऊस उत्पादक शेतक-यांनी केली आंदोलनास सुरुवात

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले कर्नाटकातही आंदोलन

कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार ३ हजार दरावर ठाम

शेतक-यांना हा दर मान्य नाही

कर्नाटक राज्यातील काटामारी आणि रिकव्हरी चोरी मोठ्या प्रमाणात

वजनकाटे ॲानलाईन करण्यावर शेतकरी ठाम

पुण्यात बर्निंग कारचा थरार,  5 ही पर्यटक सुखरूप

राजगड तालुक्यातील वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत पाबे येथे निलेश सुरेश देशपांडे रा. कर्वेनगर पुणे यांच्या कारला आग लागली. गाडीतील 5 ही पर्यटक सुखरूप आहेत. प्रसंगावधान राखत सर्व गाडीच्या बाहेर आले. कार पूर्ण जळून खाक झाली. अग्निशामन घटनास्थळी दाखल झाले.

पुणे येथील शिरूरमध्ये संतप्त ग्रामस्थ आणि पोलीसांमध्ये तणाव

बेल्हा जेजुरी महामार्ग रोखणार ग्रामस्थ आक्रमक

चिमुकल्याचा मृतदेह घरासमोर ठेवुन आंदोलन करणार

बिबट माणुस संघर्षात आगीच्या थिंनगीने सुरुवात

रात्रीत बेल्हा जेजुरी महामार्ग रोखण्यावर ग्रामस्थ ठाम

मॅरेथॉनमध्ये धावले सोलापूरकर होम मैदान ते धावण्याच्या मार्गावर ‘सकाळ’चे कौतूक

सोलापूर आणि ‘सकाळ’ हे नाते खूप जुने आहे. ‘सकाळ’तर्फे आयोजित प्रत्येक उपक्रमांना जसा प्रतिसाद असतो,तसाच प्रतिसाद १०- के रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी सोलापूरकरांचा मिळाला.आज पहाट सर्वांसाठी सुखदायी होती.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पर्धा जिंकण्याची जिद्द होती. पहाटे पावसाचा शिडकाव झाल्याने सगळीकडे अल्हाददायक वातावरण होते. होम मैदानावर जमल्यापासून तीन,पाच आणि दहा किलोमीटर पूर्ण करणाऱ्यांच्या तोंडातून व्वा...जबरदस्त...एकच नंबर! असे शब्द होते

इस्रोच्या बाहुबलीचे उपग्रहाचे प्रक्षेपण

कोंढवा हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

अमन शेख,अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे या तिघांना पुणे सत्र न्यायालयात केले हजर

काल दुपारी गणेश काळे याची केली होती हत्या

यातील तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनो आज कोर्टात हजर केल होत.

Beed News : बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा मुंडे - धस संघर्ष

मंत्री पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघात लक्ष देण्याची भूमिका जाहीर करून आमदार सुरेश धस यांना आव्हान दिले. दरम्यान यालाच आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या राज्याच्या मंत्री आहेत. त्यांना काय लक्ष घालायचं ते घालू द्या. आम्ही कुठे काय म्हणतो. अस म्हणत मुंडे धस संघर्षावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली.

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी मध्ये दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात आष्टी मतदारसंघात मी स्वतः लक्ष घालणार असे जाहीर केले. मुंडेंच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मुंडे धस संघर्ष दिसून आला. केज आणि आष्टी मतदार संघात आमचे जिल्हा परिषदेचे जास्त सदस्य आहे. मला कुणाचीही एलर्जी नाही. मात्र आष्टीत आमच्याच माणसावर अटॅक केला जातो. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धस यांना लक्ष केले.

Maharashtra Politics : मंत्री भरत गोगावले यांची खा. सुनिल तटकरे यांनी उडवली खिल्ली

मंत्री भरत गोगावले यांची जागा वाटपाच्या फॉम्युल्यावरून खा. सुनिल तटकरे यांनी उडवली खिल्ली

ज्याचे जेवढे आमदार त्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीत महायुतीचे जागा वाटप करण्याचा फॉम्युला मंत्री भरत गोगावले यांनी दिला होता

गोगावले यांच्या फॉम्युल्याला आगाध ज्ञान असा उल्लेख करीत आपण चक्रावून गेलो असल्याचे तटकरे म्हणाले आहेत

2014 पासून मी जागा वाटप काम केल्याच सांगत असल सुत्र कधी कानावर न पडल्याने मी भांबावून गोलो आहे

Sanjay Shirsath : मंत्री संजय शिरसाठ यांचा आज बुलढाण्यात आज नागरी सत्कार

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज बुलढाण्यात त्यांचा आ. संजय गायकवाड यांच्याकडून स्थानिक गर्दे हॉल येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. आजच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात जवळपास वीस गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेल असताना मात्र अशा परिस्थितीत राज्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त असताना मंत्री मात्र नागरि सत्कारात व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यांनी सत्कार स्वीकारण्या ऐवजी शेतकऱ्यांना मदत करावी अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे..

Dhule News : महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून निर्घृण हत्या

साक्री तालुक्यातील दिघावे येथे एका महिलेच्या डोक्यात लोखंडी सळईने घाव घालून निर्घृण खून करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेनंतर संशयित पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅन मधून पळ काढण्याचा प्रयत्नात असताना सतर्क ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले आहे,

Accident News : मानखुर्द उड्डाणपुलावर ऑईल ट्रकचा भीषण अपघात

मानखुर्द उड्डाणपुलावर ऑईल ट्रकचा भीषण अपघात

ट्रक उड्डाण पुलावरून अर्धा बाहेर आला, मोठी दुर्घटना टळली.

चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे

आता हा ट्रक क्रेनच्या साह्याने साईडला करण्याचे काम सुरू आहे

Maharashtra News : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची घोषणा होणार

शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटाच्या पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्ष पद मुरलीधर मोहोळ यांना देण्याच निश्चित

संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार सर्वानुमते अजित पवारांना देण्यात आले

आज अजित पवार आपल्या कार्यकारणीच्या सदस्यांची घोषणा करणार यासोबतच ४ उपाध्यक्ष देखील नेमणार

शुक्रवारी रात्री खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याच निश्चित

Mumbai News : खारमध्ये मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस

खार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटारसायकल चोरीच्या मालिका उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून एकूण पाच चोरीच्या होंडा एक्टिव्हा मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.

पोलिसांनी चोरी गेलेली मोटारसायकल तसेच इतर ठिकाणांहून चार अतिरिक्त मोटारसायकली मिळून एकूण पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यातील तीन मोटारसायकली गुन्ह्यातील असून उर्वरित दोन्हीसाठी मालकांचा शोध सुरू आहे.

Jalna News : जालना नांदेड समृद्धी महामार्गतील बाधित शेतकऱ्यांनी रोखलं समृद्धी महामार्गच काम

जालना -नांदेड समृद्धी महामार्गतील नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज नांदेड शहरानजीक सुरु असलेले काम थांबवलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील बारा गावे या महामार्ग बाधित आहेत. या बारा गावातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचे मूल्यकंन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मावेजा देण्यात यावा, सर्व्हिस रोड, आपले अवार्ड मधील राहिलेले बारा टक्के व्याज मिळावे, यासह विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी आज सुरवात होत असलेल्या समृद्धी महामार्गचे काम थांबवले आहे.

दरम्यान मागण्या पूर्ण नाही झाल्यास सर्व कुटुंबासह विष प्राशान करून आपलं जीवन संपवू असा इशारा या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Kalyan News : चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण झोन तीन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यात महिलांच्या चेन स्नॅचिंगच्या मालिकेनं डोकेदुखी ठरलेल्या सराईत इराणी टोळीच्या सदस्याला अखेर कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अर्धा किलोमीटर गल्लीबोळातून पाठलाग करत कल्याण परिमंडळ ३ च्या पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराला पकडलं.विशेष म्हणजे, आरोपीला पकडताना त्याच्या घरच्यांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला.

पण तरीही पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपीला ताब्यात घेतलं.जुल्फेकार इराणी असे या इराणी आरोपीचे नाव असून हा मुंबईतील अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी होता. सध्या कल्याण पोलिसांनी या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले असून तपासात मुंबईतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

Nashik News : मुसळधार पावसाचा मिरची पिकावर गंभीर परिणाम, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता मिरची पिकावर स्पष्टपणे दिसू लागला आहे.

अतिवृष्टीमुळे शेतातील उभे मिरचीचे पीक पाण्याखाली गेल्याने त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोळेगाव परिसरातील शेतांमध्ये मिरची पिकावर कुज व कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणी करावी लागत आहे.

त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, हा खर्च वसूल होईल का नाही याबाबत शेतकरी भीती व्यक्त करत आहे

Maharashtra Politics : विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी संबंध नाही लक्ष्मण हाकेंची जहरी टीका

लक्ष्मण हाकेंनी विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. सामाजिक न्याय म्हणजे हेच त्यांना कधी समजलं नाही. माहित असतं तर त्यांनी बेफिकीर बिनडोक पद्धतीने बोलले नसते.

अशा शब्दात विखे पाटलांवर टीका केली. अहिल्या नगर मधील बोधेगाव मध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला

परभणीत पुन्हा एकदा जोरदार पाऊसाची हजेरी, शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस

परभणीत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलीय.मागच्या अर्ध्या तासापासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस बरसतोय.या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे शिवाय ग्रामीण भागातील काढणीला आलेला कापूस तर पूर्णतः शेतकऱ्यांच्या हातून गेलाय.महत्वाचे म्हणजे सतत बरसणाऱ्या पावसामुळे रब्बीची पेरणी ही खोळंबली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात आज रात्री आणि आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे .. त्यामुळे पावसानं मोठे नुकसान झाले आहे .. याची पाहणी करणेसाठी बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतात जाऊन पाहणी केलीय .. आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.. तर आमदार गायकआड यांनी शेतकऱ्यांना तत्काळ एक लाखांची मदत केलीय ..

राष्ट्रवादी अजित पवारांची महत्वाची बैठक

मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणूक पूर्व चर्चेसाठी बैठक असल्याची माहिती

पुरंदरमधील गुळुंचे येथे हजारो भाविकांनी अनुभवला काटेबारसचा थरार.

पुण्यातल्या पुरंदरमधल्या गुळुंचे गावात आज काटेबारस यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रे निमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उड्या घेत आपला देव भेटीचा मार्ग खुला केला.हजारो भाविकांनी हा काटेबारसीचा थरार अनुभवलाय.

चिपळूण आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर शरचंद्र पवार गटाचा दावा

महाविकास आघाडीच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या प्राथमिक बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्यातील शहरांची सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी आग्रही

या दोन नगराध्यक्ष पदांच्या मोबदल्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद उद्धव ठाकरे सेनेला सोडण्याचा देखिल प्रस्ताव

रत्नागिरी आणि चिपळूण नगराध्यक्षपदाची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

तर राजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद काँग्रेसला तर खेडचे नगराध्यक्ष पद उद्धव ठाकरे शिवसेनेला सोडण्यासंदर्भात बैठकीत बोलणी

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मदत करा नगराध्यक्ष पदाच्या वेळी विचार केला जाईल असं सागितलं होतं

शरदचंद्र पवार गटाच्या मागणीमुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता

टीम इंडियाला आणि स्मृती मानधनाला तिच्या कोच आणि मित्र परिवार कडून शुभेच्छा

महिला विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामना आज पार पडतोय,या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे देखील सगळ्यांचाच लक्ष राहिले आहे.स्मृती मानधना ही सांगलीची आहे.त्यामुळे सांगलीकरांचे देखील आजच्या सामन्याकडे आणि स्मृती मानधनाच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिला आहे.

मोताळा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार.

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार बघायला मिळाला.. रात्री सुद्धा मोताळा तालुक्यातील किन्होळा, धामणगाव बढे या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मक्याची शेती पूर्णतः उध्वस्त झाली आहे.. शेकडो हेक्टर शेतीत अद्यापही फूटभर पाणी साचून असल्याने शेतकऱ्याने कापून ठेवलेला मका भिजला आहे.. तर अनेक ठिकाणी मक्याला अंकुर फुटले आहेत.. सोयाबीन गंजी, कापसाचे नुकसान झाले आहे. .. नोव्हेंबर महिन्यातही पाऊस बरसात असल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवाल दिल झाला आहे

 nashik-malegaon-लहान मुलांच्या किरकोळ वादातून गोळीबार

नाशिकच्या मालेगाव मध्ये काल रात्रीच्या सुमारास लहान मुलांच्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून कुरापत काढत मेहताब अली या संशयिताने सुमारे 10 ते 12 साथीदार जमवत दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामील यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या,सुदैवाने फिर्यादी खाली बसल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला.यानंतर १० ते १२ संशयित आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करत,घरात जबरदस्तीने घुसून घरातील वस्तूंची तोडफोड केली.यावेळी एका संशयितांने हातात दोन तलवारी घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला..एवढंच नव्हे तर घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल पाडून नुकसान केलं. या गोंधळात फिर्याद देणाऱ्याचा मोबाईल व तब्बल ५०,००० रोख रक्कम गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे.. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आयेशानगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Nandurbar News : नंदुरबार शहरात कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

वारकरी संप्रदायाच्या प्रमुख एकादशींपैकी एक असलेल्या कार्तिकी एकादशीच्या मंगलमय मुहूर्तावर नंदुरबार शहरातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात हजेरी लावली आहे, ज्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.

नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात मोठी घडामोड

- विधानसभा निवडणुकीत उमेदवारी केलेल्या उदय सांगळे आणि सुनिता चारोस्कर यांची पक्षातून हकालपट्टी

- सिन्नर मतदारसंघातून उदय सांगळे आणि दिंडोरी मतदारसंघातून सुनिता चारोस्कर यांनी लढवली होती निवडणूक

- स्वार्थी आणि दलबदलू मानसिकतेचे तसेच पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने हकालपट्टी करण्यात आल्याची शरद पवार गटाकडून काढण्यात आलेल्या पत्रात नोंद

- हे दोन्ही पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मात्र त्यापूर्वीच पक्षातून करण्यात आली हकालपट्टी

महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला गंभिर स्वरूपाची मारहाण

मनसेचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे याला मारहाण

० पंकज उमासरे याच्या चवदार तळे येथील दुकानात शिरून करण्यात आली मारहाण

० पंकज उमासरे याने दोन दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती

० या मुलाखतीच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय

० मारहाण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

० गंभिर जखमी पंकज उमासरे याच्यावर महाडच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु

कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याचे धमकी

अज्ञात इसमांनी उदय नारकर यांना फोनवरून धमकी दिली. राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दौलत साखर कारखान्याच्या संबंधित आंदोलन केल्याने धमकी आल्याचा नारकर यांचा दावा. घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची दिली फोनवरून धमकी

साईंच्या शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्साह

साईबाबांच्या शिर्डीतही कार्तिकी एकादशीचा उत्साह बघायला मिळतोय.. साई समाधीवर विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली असून साई मूर्तीला सुवर्ण आभूषणासह तुळशी पत्रांची माळ परिधान परिधान करण्यात आली आहे.. साईबाबांचे विठ्ठलरूपी दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.. साई मंदिरात दररोज 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरती संपन्न होत असल्याने विठुरायाचे आणि साईबाबांचे आध्यात्मिक नाते जपण्याचे काम आजही साई संस्थानकडून केले जाते आहे..

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात

पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला आहे

अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर गाडीतील एक जण गंभीर जखमी आहे..

कोरेगाव पोलीस स्टेशन कडून तपास सुरू आहे अपघात नेमका कसा झाला याचा

मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक : महिला गंभीर जखमी

सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहीती मिळताच परिसरातील नागरिकांनी संतप्त होऊन अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पोलीसांना पाचारण केले. दरम्यान या अपघातामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीत काही काळ अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

भाषा धोरणाला राज्यातून विरोधच - डॉ. नरेंद्र जाधव

त्रिभाषा धोरणाला राज्यातून विरोधच आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पहिलीपासून हिंदी विषयाची गरज नाही. हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून सुरू करावी, असे स्पष्ट मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भाराभार चिंध्या, अशी अवस्था होईल. रत्नागिरीत बहुतांशी नागरिकांनी पाचवीपासून हिंदी असावी.राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला जोरदार विरोध झाला. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांनी घेतल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे अध्यादेश रद्द केले.राज्यातील आठ विभागांमध्ये जाऊन स्थानिक मते जाणून घेतली जात आहेत. त्यानुसार अहवाल तयार करण्यात येत असून पुढे किमान २० वर्षे हा अहवाल चालेल. हा अहवाल ४२ कोटी बालकांचे भविष्य घडवणारा आहे. भविष्यातील मुलांचे हित लक्षात घेऊन अहवाल दिला जाईल.

अमेरिकन लोकांना फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरला २२ वर्षांच्या तरुणाचे फंडिंग 

छत्रपती संभाजी नगर मधील अमेरिकन लोकांना फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरला एका २२ वर्षांच्या तरुणाने फंडिंग केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपी राजवीर प्रदीप शर्मा (२२, रा. वल्लभनगर, अहमदाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे., या रॅकेटला फंड हा राजवीर करीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. राजवीरचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी याला आरोपी जॉनने छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉल सेंटर सुरू करण्याचे सुचवले होते. त्यानुसार बलवीरने फारुकीच्या मदतीने हे बोगस कॉल सेंटर शहरात उभारले. बलवीर-राजवीर यांचे नातेवाईक मोहाली, अहमदाबाद, मुंबई तसेच परदेशात वास्तव्यास असून या टोळीला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडूनच साहाय्य मिळत असल्याची माहिती फारुकीने चौकशीत उघड केली.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भगवा फडकणार- संजय शिरसाट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत.मेळावे, बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.दरम्यान समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या.आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी पक्षाचा आदेश येईल तो आम्ही पाळू.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भगवा फडकणार असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जालन्यातील उमरी गावात विविध मागण्यांसाठी तरुणांचे आमरण उपोषण

जालन्यातील उमरी गावात विविध मागण्यांसाठी तरुणांचे आमरण उपोषण सुरू आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह स्थानिक मागण्यासाठी तरुणांनी थेट गावातच आमरण उपोषण सुरुवात केली.जालना तालुक्यातील उमरी येथील तरुणांनी विविध मागण्यासंदर्भात गावातीलच मंदिराच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे .शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, पाथरूड ते उमरी दरम्यान असलेल्या पुलाची उंची वाढवावी यासह विविध मागण्यांसाठी उमरी येथील तरुणांचे गावात उपोषण सुरू आहे.

कार्तिकी एकादशी निमित्ताने मावळतील शेतकऱ्यांनी घातले विठ्ठलाला साकडे... देवा आत्तातरी पाऊस थांबव

कार्तिकी एकादशी निमित्ताने मावळ तालुक्यामधील घोणशेत गावांमधील शेतकऱ्यांनी काकड आरतीचे आयोजन करत विठ्ठलाला साकडे घातले की देवा आत्तातरी पाऊस थांबाव. मावळ तालुक्यामध्ये गेले दहा दिवस झाले सतत अवकाळी पाऊस चालू आहे. त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वर्षभर आम्ही शेतकऱ्यांनी खायचं काय असा प्रश्न विठ्ठलाला शेतकऱ्यांनी विचारलेला आहे. सतत पडलेल्या पावसामुळे भाताचे मोठे नुकसान होऊन भातावर करपा रोख तर आलाच आहे. मात्र या पावसामुळे भाताला बुरशी यायला लागले. राज्यातील नागरिक पाऊस पडाव म्हणून देवाला साखळी घालतात मात्र मावळ्यातील शेतकरी पाऊस थांबव देवा असा विठ्ठलाला साखर घालत आहे.

महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार-इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवला जाणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आनंत मुळे यांनी दिली आहे. MARD असोसिएशनच्या रेसिडंट डॉक्टरांकडुन शासकीय रुग्णालयांमधील संपूर्ण राज्यभरात बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद ठेवला जाणार आहे. बाह्यरूग्ण विभाग बंद ठेवल्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास पूर्ण सेवा बंद केली जाणार असल्याची देखील माहिती यावेळी असोसिएशनकडून देण्यात आली आहे. तसेच महिला डॉक्टरला न्याय मिळाला नाही तर 7 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत शासकीय आणि खासगी सर्व डॉक्टर्स सेवा बंद ठेवणार आहेत.

वाशिमच्या शिरपूर मध्ये 4 ते 5 जणांनी केला एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला

वाशिमच्या शिरपूर बस स्थानक परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान 4 ते 5 जणांनी विशाल गोपाल देशमुख या तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची घटना घडली असून,या हल्ल्यात तरुणाच्या पोटावर चाकूचे वार करण्यात आल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी अकोला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.चाकू हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून यातील आरोपी फरार झाले आहेत.

 समृद्धी महामार्गावरील मालेगाव टोल प्लाझा परिसर मागील आठ दिवसापासून अंधारात

प्रवाशांना समृद्धी महामार्गाचा प्रवास अत्यंत सुरक्षित प्रवास असं राज्य शासनाकडून सांगितलं जात असताना वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझा परिसरात मागील आठ दिवसापासून रात्रीला अंधाराच साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे रात्रीला प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला आहे. महावितरणच्या वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील आठ दिवसांपासून मालेगाव जहांगीर येथील टोल प्लाझाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे,त्यामुळे रात्रीला प्रवाशांच्या जीवाला धोका वाढला आहे. या ठिकाणी आपले वाहन रात्रीला थांबणे म्हणजे अपघाताला आणि डिझेल चोरीला आमंत्रण देणे अशीच परिस्थिती मागील आठ दिवसापासून झाली आहे. टोल प्लाझा च्या अत्यावश्यक सेवेकरिता काही काळ जनरेटर चालू करून बॅटऱ्या चार्ज करून वापरल्या जात आहे.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

कार्तिकी वारीसाठी 6 लाख वारकरी दाखल झाले असून, वैष्णवांच्या गर्दीने पंढरी नगरी दुमदुमली आहे. राज्याच्या काही भागात पूर आणि अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कार्तिकी वारीच्या संख्येत घट झाली आहे. मध्यरात्री पासूनच वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करून देवाच्या पद स्पर्श दर्शन रांग मुख दर्शन रांगेत दर्शन जात आहेत. प्रदक्षिणा मार्ग पंढरपूर मधील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांची दाटी झाली आहे. अवघी पंढरी विठू नामाच्या जय घोषाने दुमदुमली आहे. टाळ वीणा अभंग पताका घेतलेले वारकरी आपल्या दिंडी घेऊन प्रदक्षिणेला निघाले आहेत.

Hingoli News : संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 755 व्या जन्मउत्सव सुरू

संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जन्म सोहळ्या निमित्त हिंगोलीत दीप उत्सव साजरा करण्यात आला आहे. संत नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी येथे हजारो महिलांनी दीप पेटवत या सोहळ्यात उपस्थिती लावली आहे. गेल्या सात दिवसांपासून या कार्यक्रमांची तयारी सुरू करण्यात येती. आज सायंकाळी संत नामदेव महाराजांच्या मूर्तीची नरसीमध्ये मंदिर समितीच्या वतीने भव्य मिरवणूक सोहळा काढण्यात येतो तर उद्या दहा ते बारा या कार्यक्रमाची समाप्ती होती.

नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत. गेल्या काही वर्षात या मध्ये वाढ झाल्याने सिडकोने या विरोधात कडक ॲक्शन घेण्यास सुरवात केली आहे. विशेषतः गावठाण भागात ही अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. वर्षभरात सिडकोच्या अतिक्रमण विभागाने ६५० अनधिकृत इमारती तोडल्या आहेत. या मध्ये ३ मजल्यां पासून १० मजल्या पर्यंतच्या इमारतींचा समावेश आहे. खारघर येथील दोन इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला.

विठ्ठलाची महापूजा होताच एकनाथ शिंदे यांनी वारकरी महाराज मंडळींचे केले संतपूजन

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील धुंडा महाराज देगलूरकर मठाला भेट दिली. विठ्ठलाची महापूजा होताच पंढरपुरातील अनेक संत महाराज मंडळींची भेट घेऊन त्यांना आहेर करत एकनाथ शिंदे यांनी संत पूजन केले. यावेळी वारकऱ्यांना देखील भजनी साहित्याचे वाटप एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. एकादशीच्या पर्वणी निमित्त विठ्ठलाच्या महापूजा नंतर थेट महाराज मंडळी यांचे संत पूजन करत वारकर यांची संवाद साधण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्याकडून घडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com