पुणे -
विनापरवाना ऊस गाळप केल्यास कारवाई, साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा
२०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामासाठी ऑनलाइन गाळप परवान्यांचे अर्ज १ सप्टेंबरपासून स्वीकारले जाणार आहेत.
परवाना मिळाल्याशिवाय सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गाळप सुरू करू नये, अशा सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.
मागील हंगामातील उसाचे शंभर टक्के बिल शेतकऱ्यांना दिलेले असणे बंधनकारक आहे.
विनापरवाना गाळप सुरू केल्यास संबंधित कारखान्यावर कारवाई केली जाणार आहे.