VIDEO: प्रती दिंडी २० हजार देणार, अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पाची सुरूवातच त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी पहिल्या योजनेची घोषणा वारकऱ्यांसाठी केली. वारकऱ्यांच्या प्रती दिंडी २० हजार रुपयांची घोषणा अजित पवारांनी केली. महायुती सरकारची ही मोठी घोषणा असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांनी वारकऱ्यांसाठी घोषणा करताना सांगितले की, देहू-आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. वारकऱ्यांना मोफत औषधे देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केली जाणार आहे. अजित पवारांच्या या घोषणेमुळे वारकरी दिंड्यांना चांगला फायदा होणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.