ऐकलंत, ही आहे पहलगाममधील पीडित महिला, या महिलेच्या पतीला दहशतवाद्यांनी आधी नाव विचारलं, मग धर्म.. आणि त्यानंतर त्याची क्रूरतेने हत्या केली. त्यात दहशतवाद्यांनी पर्यटकाना पँट काढायला सांगितली.. त्यांचे गुप्तांग तपासले. पर्यटकांना कलमा वाचयला लावल्या... त्यानंतर हिंदूंना टार्गेट करत गोळ्या झाडून दहशवाद्यांनी नरसंहार घडवून आणला. मात्र हिंदूंचा हा नरसंहार घडवून आणण्यामागचा उद्देश हा देशात धार्मिक तेढ निर्माण करणं... हाच एकमेव उद्देश होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दहशतवाद्यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केलेल्या विधानानंतर काश्मीरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. असीम मुनीर यांनी काश्मीर आणि इस्लामाबादला गळ्याची नस असल्याचे म्हटलं होतं. तसंच मुनीर यांनी फळणीचा मुद्दा उपस्थित करून हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही, असं विधानही केलं होतं.
काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काश्मिरमध्ये हिंदूंचा नरसंहार घडलाय. या हल्ल्यानं हिंदूंच्या नरसंहारचं काश्मिरमधील सत्र कधी थांबणार? असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे कट्टरतेची बीज पेरणाऱ्यांचा बंदोबस्त करणे हे आता भारतापुढचं आव्हानेय. अन्यथा काश्मिरमधील हिंदूचं स्थलांतर यापुढेही होतचं राहिलं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.