अभिजित देशमुख
कल्याण : गांजा तस्करी करण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार शालिमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करत असलेल्या एका आरोपीला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून तब्बल साडेआठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेल्या या कारवाईत शिराज खलील खान (वय ३४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे. तर सध्या तो वेल्डिंगच्या कामासाठी ओडिशामध्ये राहत होता. दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजता शिराज खान हा गांजा घेऊन शालिमार एक्सप्रेसने कल्याण स्टेशनवर उतरला होता.
संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय
स्टेशन परिसरात त्याच्या संशयास्पद हालचाली करत असल्याने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे साडेआठ किलो गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ६९ हजार रुपये असल्याची माहिती आहे. गांजा आढळून आल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी शिराज यास ताब्यात घेतले आहे.
ओडिसा येथून आणला गांजा
दरम्यान पोलिसांनी त्याची चौकशी केली असता प्राथमिक चौकशीत शिराज खान याने गांजा ओडिसा येथून आणला असून तो घेऊन भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली दिली आहे. यानंतर त्याला ताब्यात घेतले असून सध्या आरोपीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.