Kalyan Breaking News : मुसळधार पावसामुळे कल्याणमधील काळू नदीच्या पाणीपातळीत वाढ, अनेक गावांचा संपर्क तुटला

Kalyan Kalu River Bridge : कल्याणमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काळू नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्यातील टिटवाळाजवळचा रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे.
Kalyan Kalu river bridge
Kalyan Kalu river bridgeSaam TV
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही

मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. कल्याणमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काळू नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्यातील टिटवाळाजवळचा रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पुराचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आलाय.

Kalyan Kalu river bridge
Weather Forecast : महाराष्ट्रात आजही पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

कल्याणसह परिसरात शनिवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. काळू नदीला महापूर आल्याने संपूर्ण रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे रुंदा, उशिद, मढ, आरेले, भोंगाळपाडा इत्यादी गावांचा कल्याणसोबत असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काळू नदीला महापूर आल्याने गावातील कोणत्याही नागरिकांनी पुलावरून प्रवास करू नये, असं आवाहन तहसील प्रशासनाकडून ग्रामस्थांना करण्यात आलं आहे. गावकऱ्यांना महत्वाच्या कामासाठी कल्याणला जायचं असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

भिवंडीत मुसळधार पावसाने हाहाकार

भिवंडी शहरात रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरात हाहाकार उडवलेला आहे. शहरातील मुख्य भाजी मार्केट, बाजारपेठ, तीनबत्ती, नजराणा सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज चौक यासह ईदगाह झोपडपट्टी कामवारी नदीकिनारी म्हाडा कॉलनी या संपूर्ण परिसरात पाणी साचले होते. भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौक नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता.

त्यामुळेच नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती. तर खाडी किनारी असलेल्या ईदगाह या झोपडपट्टीमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचल्याने झोपडपट्टीतील सर्वच घरांमध्ये पाणी शिरले आहे. सकाळ पासून येथील पूरजन्य परिस्थिती असताना भिवंडी महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन या ठिकाणी नागरिकांच्या मदतीसाठी आलेले नव्हते. त्यामुळे नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे.

Kalyan Kalu river bridge
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ, पाहा आजची ताजी आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com