
अक्षय शिंदे (साम टीव्ही)
Jalna News: चोर समजून जमावाने तिघांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना काल (३० डिसेंबर) सायंकाळी जालना जिल्ह्यात घडली आहे. जालन्यामधील गुळखंड तांडा येथे ही घटना झाली आहे. भांडी घासायची पावडर विकण्यासाठी आलेल्या तिघांना जमावाने लाठी, काठ्या आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदर कुमार साह हा तरुण त्याच्या दोन साथीदारांसह भांडी घासायची पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा येथे आला होता. जमावातील दोघांनी हे चोर आहेत असे म्हणत लोकांची गर्दी जमवली. पुढे गर्दीतील लोकांनी लोखंडी पाईप, काठ्या, लाकडी दांड्यांनी तिघांना अमानुषपणे मारहाण केली. मारहाणीमध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.
परतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी तिघेजण भांडे घासण्याची पावडर विकण्याच्या हेतूने जालना जिल्ह्यातील गुळखंड तांडा गावात आले होते. तेथे दोन-तीन जणांनी हे चोर आहेत असा दावा करत परिसरातील लोकांना बोलावले. पुढे संतप्त जमावाने या तिघांनाही जबर मार दिला.
मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी जमावातील ४५ लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरु असून दोषींवर लवकरच कारवाई होईल असे परतूर पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरु असल्याचेही म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.