अक्षय शिंदे
जालना : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतमालाची गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला.
जालन्यात शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून गुढीपाडव्याच्या दिवशी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्याचा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे. याच विरोधात आजचे आंदोलन करण्यात आले.
अन्यथा रस्त्यावरची लढाई
कर्जमाफी न देण्याच्या सरकारच्या निर्णयाने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. शिवाय शेतकरी देखील नाराज झाले आहेत. दरम्यान सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढणार; असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कोल्हापूरमध्येही निषेध
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही; अशी केलेली वल्गना तसेच शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गुढी पाडव्यादिवशी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी १०० दिवसात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपने काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.