
जालन्यामध्ये २२ वर्षीय तरुणाचा जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला होता. या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सख्ख्या भावांनी या तरुणाची हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या संशयावरून या तरुणाची हत्या करण्यात आली. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावामध्ये ३ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी भावाचा मृतदेह जाळून टाकला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुना या गावात ३ दिवसांपूर्वी एका २२ वर्षीय युवकाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका गायरान जमिनीत आढळून आला होता. हा तरुण कोण आहे याचा तपास पोलिस करत होते. आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येच्या तिसऱ्या दिवशी या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
दोन सख्ख्या भावांनीच आकाश जाधव याचा खून केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली. याप्रकरणी बालाजी मिसाळ आणि गणेश मिसाळ या २ सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली. बहिणीसोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या संशयावरून या दोन सख्ख्या भावांनी आकाशला रात्री बोलावून घेतले आणि त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या दुचाकीतील पेट्रोल काढून त्याचा मृतदेह जाळून टाकला.
आकाशचा मृतेदह जाळून टाकल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही हत्या असल्याचे कळताच जालना पोलिसांनी तपासाची सर्व चक्रे फिरवली. पोलिसांनी जलद गतीने तपास करत आकाळच्या मारेकऱ्यांना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे. आकशच्या कुटुंबीयांना यामुळे मोठा धक्का बसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.