Dharashiv Water Crisis : धाराशिव जिल्ह्यातील सात तलाव पडले कोरडे; पाणीटंचाईचा समस्या गडद

Dharashiv News : उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची समस्या देखील भेडसावू लागली आहे. अनेक भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेने तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत घट होत आहे
Dharashiv Water Crisis
Dharashiv Water CrisisSaam tv
Published On

धाराशिव : उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तलाव, धरणातील पाणी साठा कमी होत चालला आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील सात तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय ४३ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची समस्या देखील भेडसावू लागली आहे. अनेक भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेने तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत घट निर्माण होत आहे. यामुळे अनेक भागात आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तीच परिस्थिती आता धाराशिव जिल्ह्यात देखील निर्माण झाली आहे. कारण जिल्ह्यातील सात तलाव कोरडे पडले आहेत. 

Dharashiv Water Crisis
Pune: स्वारगेट अत्याचारप्रकरणातील पीडित तरूणीला राज्य सरकारकडून आधार; ३ लाखांची मदत जाहीर

प्रकल्पातील पाणीसाठा २९ टक्क्यावर 

कोरडे पडणाऱ्या तलावात यापुढे मोठी भर पडत जाईल, अशी स्थिती आहे. तसेच जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठाही २९ टक्क्यांवर आल्याने चिंता वाढली आहे. उन्हाचा पारा चाळिशी पार गेला आहे. त्यात प्रकल्प कोरडे पडू लागल्याने पाणीटंचाई डोके वर काढू लागली. अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. गाव-खेड्यांतील नागरिकांची तहान कशीतरी भागत असली तरी पशुधनासह वन्यप्राण्यांचे मात्र हाल होत आहेत.

Dharashiv Water Crisis
Yavatmal : जन्म दाखल्यासाठी फसवणूक; खोट्या कागदपत्रावरून जन्माची नोंदप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

शिवारातील विहीर, कूपनलिका आटल्या आहेत. काहींचे पाणी कमी आले आहे. त्यात तलाव आटू लागल्याने पशुधनाला पाणी पुरविणे कठीण झाले. पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची भटकंती वाढली. जिल्ह्यातील एकूण २२६ पैकी ६६ तलावांतील पाणीसाठा २५ टक्क्यांच्या खाली गेला आहे. त्यात ६४ लघु, तर २ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. २५ ते ५० टक्के दरम्यान उपयुक्त पाणीसाठा असलेले ८७ तलाव आहेत. यामध्ये ७७ लघु, नऊ मध्यम आणि एक मोठा प्रकल्प आहे. २० प्रकल्पांत केवळ ५० ते ७५ टक्के दरम्यान उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पांत १६ लघु आणि चार मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ७५ टक्क्यांवर पाणीसाठा असलेले दोनच प्रकल्प आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com