Tanaji Sawant : तानाजी सावंतांच्या १५ कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली, खोटा गुन्हा दाखल, धाराशिवच्या तरूणाचा गंभीर आरोप

Dharashiv Crime : माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप होत आहे. अंजली दमानिया यांनी याप्रकरणी पोस्ट करत सवाल केला.
Tanaji Sawant Dharashiv Bhoom
Tanaji Sawant Dharashiv Bhoom
Published On

Tanaji Sawant Dharashiv Bhoom : माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रत्नदीप चव्हाण यानं तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यावर मारहाण केल्याचा आणि खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अंजली दमानिया यांनी ट्वीट करत तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

धाराशिवमधील भूम तालुक्यातील वाल्हा येथे तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी रत्नदीप चव्हाण या व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या १४ ते १५ कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप रत्नदीप चव्हाण यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेदम मारहाण झल्यानंतर जखमी रत्नदीप चव्हाण यांच्यावर धाराशिव येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आधीही अनेक वेळा खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केल्याचा चव्हाण यांनी आरोप केला आहे.

Tanaji Sawant Dharashiv Bhoom
Crime : बॉयफ्रेंडसोबत बोलण्यास रोखलं, संतापलेल्या बायकोनं नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

अंजली दमानिया यांनी एका मेसेजचा स्क्रिनशॉट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रत्नदीप चव्हाण यांचा एक मेसेज पोस्ट केला आहे. त्यामध्ये तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. तानाजी सावंत यांच्या माणसांपासून जिवाला धोका आहे, त्यांनी अनेकदा मारहाण केली अन् खोटे गुन्हे दाखल केल्याचे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

Tanaji Sawant Dharashiv Bhoom
Beed Crime: बीडमध्ये मारहाणीत विकासचा मृत्यू, हत्येनंतर क्षीरसागरचा फोन; ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

रत्नदीप चव्हाण यांच्या मेसेजमध्ये नेमकं काय आहे....?

ताई मी रत्नदीप शिवाजी चव्हाण बोलत आहे. मी वाल्हा सामनगाव ग्रामपंचायतचा गटनेता आहे. ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आल्यापासून आमदार तानाजी सावंत यांचे लोक, तसेच तालुका कृषी सभापती यांनी काल मला अमानुषपणे मारहाण केली. ताई मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मी खूप दहशतीत आहे. माझे प्राण वाचवा. माझ्या विरोधात तक्रारही घेत नाहीत. पोलीस स्टेशनचे लोक त्यांना स्वतःच्या दबावपोटी एफआयआर घेत नाहीत. भूम तालुका पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव. ताई माझे प्राण वाचवा मी खूप दहशतीत आहे.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी चव्हाण यांचा मेसेज पोस्ट करत तानाजी सावंत यांना इशारा दिला आहे. दादागिरी बंद करा, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. "आमदार तानाजी सावंत. ह्या रत्नदीप चव्हाणांच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. बंद करा आता दादागिरी आणि दहशत", असं अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com