Kolhapur Bandh Update : काेल्हापूरातील विराेधी पक्षाचे नेते म्हणतात मला माहित आहे दंगल घडविण्यात येणार आहे. त्यानंतर काही युवक औरंगजेब, टिप सुलतान (tipu sultan) यांचे उदात्तीकरण करतात आणि त्यानंतर प्रतिक्रिया उमटतात. या विधानांचा आणि घटनांचा काही संबंध आहे का ? अचानक महाराष्ट्रात औरंगाजेब (aurangzeb) याचे उदात्तीकरण करणारे कसे आले. काेणा यांना फूस लावत आहे याची चाैकशी सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. (Maharashtra News)
कोल्हापुरात (Kolhapur) काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले. त्यामुळे तणाव निर्णाण झाला त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या. परिणामी कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पाेलिसांची माेठा कुमक घटनास्थळी दाखल झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी काही जणांना तंबी दिली. दरम्यान आज (बुधवार) हिंदुत्ववादी संघटनांनी काेल्हापूर बंदची हाक दिली आहे.
आज नवी मुंबईत येथे माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadnavis) यांना काेल्हापूरच्या घटनेचविषयी छेडले असता फडणवीस म्हणाले काही गोष्टी आम्हांला समाजताहेत. जे चुकीचे आहे ते खपवून घेतले जाणार नाही.
अचानकपणे औरंगजेब, टिपू सुलतान यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात उदात्तीकरण होणे हा काही याेगा याेग नाही हे आम्हांला स्पष्ट दिसत आहे. विराेधी पक्षाचे वारंवार दंगली घडविण्याचा प्रयत्न असे म्हणणे आणि औरंगजेबचे उदात्तीकरण हाेणे याचा तपास सुरु आहे असेही फडणवीस यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.