

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आजच्या सुनावणीदरम्यान हा मोठा निर्णय दिला. सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकाल २१ नोव्हेंबरला लागेल असं खंडपीठाने सांगितले. कोर्टाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत त्यांनी निवडणूक आयोगाचे पुन्हा कान टोचले. 'पहिल्यांदा अशी निवडणूक पाहतोय. हे यंत्रणेचे अपयश आहे.', असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. मतमोजणी लांबणीलाही मुंख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'ही पद्धत योग्य वाटत नाही. पहिल्यांदा अशी निवडणूक पाहतोय. हे यंत्रणेचे अपयश आहे. यासंदर्भात माझी वैयक्तीक नाराजी मी काल बोलून दाखवली. खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर सर्वांना मान्य करावा लागेल. २४ जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणे हे मला योग्य वाटत नाही. अजूनही निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी.'
तसंच, 'ज्याठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झाल्या आहेत. अशा ठिकाणी कुणी तरी कोर्टात गेले कोर्टाने त्याला दिलासा दिला नाही पण त्यावरून निवडणुका पुढे ढकलणे हे योग्य नाही. गेली २५ ते ३० वर्षे मी निवडणुका लढवत आहे पण हे पहिल्यांदा घडत आहे. घोषीत केलेल्या निवडणुका पुढे ढकलणे, निकाल पुढे ढकलणे हे काय चालले आहे. हे मला काही योग्य वाटत नाही. जे उमेदवार मेहनत घेतात त्यांना फटका बसत आहे.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.