MVA Seat Allocation: 'मविआ'च्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; कधी होणार निर्णय? प्रकाश आंबेडकर सोबत येणार का? जाणून घ्या

Maharashtra Politics News | MVA Seat Allocation: महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाही, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.
Maha Vikas Aghadi Seat Allocation MVA Seat Allotment Discussion In Final Stage; When Will The Decision Be Made? Will Prakash Ambedkar Come Along? Find Out in Marathi
Maha Vikas Aghadi Seat Allocation MVA Seat Allotment Discussion In Final Stage; When Will The Decision Be Made? Will Prakash Ambedkar Come Along? Find Out in MarathiSaam Digital
Published On

Maha Vikas Aghadi Seat Allocation News

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Maha Vikas Aghadi Seat Allocation MVA Seat Allotment Discussion In Final Stage; When Will The Decision Be Made? Will Prakash Ambedkar Come Along? Find Out in Marathi
Nagar : काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांनी आम्हांला पक्षनिष्ठा शिकवू नये : विखे-पाटलांचा थाेरातांना टाेला

प्रकाश आंबेडकरांच्या सर्व मुद्द्यांवर सहमती

महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे. लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात संघटन मजबुत करण्याविषय़ी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपाकडूनच सुरक्षाकवच : नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत. परंतु भाजपाच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती परंतु ज्या लोकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपात घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजपा केला आहे. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटळ्याचा आरोप केला त्यांच्यावर छापे टाकले का? उलट त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केले.

Maha Vikas Aghadi Seat Allocation MVA Seat Allotment Discussion In Final Stage; When Will The Decision Be Made? Will Prakash Ambedkar Come Along? Find Out in Marathi
Kalyan News : अठरा वर्षे होऊनही आदिवासींना न्याय नाही; आदिवासी बांधवांचे कल्याण प्रांत कार्यालयावर धरणे

मोदींकडून आदर्श घोटाळ्याचा उल्लेख

आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन राज्यसभा खासदार केले. भाजपाने भ्रष्टाचारी लोकांना सुरक्षाकवच दिलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातातील १६५ जण आहेत तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, AICC चे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री अनिस अहमद, उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com