जालना : राहुल गांधी हे गावाला आणि देवाला सोडलेले सांड आहेत अशी टीका काल जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज जालन्यातील गांधींचमन चौकात रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. (Congress agitation by burning symbolic statue of Raosaheb Danve in Jalna)
हे देखील पहा -
रावसाहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा बेताल वक्तव्य करण्यासाठी आहे का? असा सवाल करत दानवे यांनी बेताल वक्तव्य करणं थांबवावे अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिलाय. दरम्यान या आंदोलनात मात्र आमदार कैलाश गोरंट्याल यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्या जालना नगरपरिषेदेवर काँग्रेसची एक हाती सत्ता असतानाही नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
काल जन आशीर्वाद यात्रेत कैलाश गोरंट्याल यांनी सहभागी होऊन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांचा सत्कार केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यात दानवेंविरुद्ध आंदोलनातही त्यांचा सहभाग दिसला नसल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.