CM Eknath Shinde यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्या; Prithviraj Chavan म्हणाले, मुळातच सरकार बेकायदेशीर पद्धतीने अस्तित्वात आलेलं

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेनेसह एनसीपी, काॅंग्रेसचे नेते त्यांचे मत व्यक्त करु लागले आहेत.
Prithviraj Chavan, CM Eknath Shinde, supreme court , maharashtra political crisis
Prithviraj Chavan, CM Eknath Shinde, supreme court , maharashtra political crisissaam tv

Prithviraj Chavan On Supreme Court Final Decision on Shivsena Case : सर्वोच्च न्यायालयाने नाेंदवलेली तीन महत्वाची निरीक्षणं पाहता महाराष्ट्रातील सरकार हे बेकायदेशिर पद्धतीने असतित्वात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी राजीनामा द्यावा आणि नवीन सरकार आणावं असे मत काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी व्यक्त केले आहे.

Prithviraj Chavan, CM Eknath Shinde, supreme court , maharashtra political crisis
'Uddhav Thackeray जनतेच्या भावनांशी खेळले'

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकाल वाचताना सर्वोच्च न्यायालयानं काही महत्वाची निरीक्षणं (Supreme Court Final Decision on Shivsena Case) नोंदवली. ही निरीक्षणं उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असल्याचे दिसून आले. परंतु मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी दिला नसता तर सरकार परत आणलं असतं, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

Prithviraj Chavan, CM Eknath Shinde, supreme court , maharashtra political crisis
Satara Crime News : पुण्यात राहणा-या सहाय्यक दुय्यम निबंधकाने साता-यात घेतली लाच; ACB ने घेतलं ताब्यात

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणती याचा निर्णय देताना फक्त संसदीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यातल्याच बहुमताचा विचार केला. संघटनेतील बहुमताचा विचार केला नाही. ही मोठी चूक आहे म्हणून सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. अध्यक्षांच्या वर्तवणूकीवर देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत. परंतु निलंबनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला नाही, कारण याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे.

Prithviraj Chavan, CM Eknath Shinde, supreme court , maharashtra political crisis
Shiv Sena आमदार म्हणाले,...तर पुन्हा लोकांच्या दारात जाईन; Congress नेते म्हणताहेत शिवसैनिक ठाकरेंकडे परततील, सरकार पाडण्याची बंद व्हावी

त्यामुळेच ही बाब विधानसभा अध्यक्षांकडे गेली आहे. एका कालबध्दपद्धतीने याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशे निर्देश न्यायालयाने दिलेत. परंत निलंबनाचा निर्णय न्यायालयाने घेतला नाही त्यामुळे हे सरकार जीवंत आहे असे म्हणावे लागेल.

चव्हाण म्हणाले ज्या आर्थी तीन संविधानीक पदांवर असलेल्या संस्था किंवा व्यक्तींनी - राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधीमंडळ अध्यक्ष- यांनी घेतलेल्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे पाहाता, मुळातच हे सरकार बेकायदेशीर पद्धतीने अस्तित्वात आलेलं आहे हे सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालातून दिसतं.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com