Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणी! जिल्ह्यात 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू, टंचाईग्रस्त भागात बांधकामांना स्थगिती

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला 412 गावे आणि 61 वाड्यांना 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणी! जिल्ह्यात 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू, टंचाईग्रस्त भागात बांधकामांना स्थगिती
प्रातिनिधिक फोटो Saam Tv

रामू ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज सद्यस्थितीला 412 गावे आणि 61 वाड्यांना 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू असून पाणीटंचाईच्या अनुषंगाने जिल्हाभरात तयारी सुरू केली आहे. मान्सून पूर्वतयारीसाठी सुद्धा आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी, पुढच्या 3 दिवसात रीतसर अर्ज किंवा निवेदन तहसीलदार यांच्याकडे द्यावा. त्याचा विचार जिल्हा प्रशासन करेल आणि ग्रामीण भागातील कोणतेही नागरीक पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे.

छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणी! जिल्ह्यात 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू, टंचाईग्रस्त भागात बांधकामांना स्थगिती
Who is Vishal Agarwal: प्रसिद्ध बिल्डर ते 600 कोटींची संपत्ती, कोण आहेत विशाल अग्रवाल?

जिल्ह्यात चारा वाहतूकला बंदी घालण्यात आली आहे. त्याबरोबरच ज्या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असेल, त्या ठिकाणी बांधकाम करण्यास 15 जूनपर्यंत बंदी घालण्यात आली असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दररोज वाढ होत असून जिल्ह्यात 91 गावांसाठी 134 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर 374 गावांना अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय. 2023-2024 मध्ये अत्यल्प पावसामुळे तलाव विहिरी पुर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच भीषण पाणीटंचाई निर्माण होताना दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगरात पाणीबाणी! जिल्ह्यात 678 टँकरने पाणीपुरवठा सुरू, टंचाईग्रस्त भागात बांधकामांना स्थगिती
Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवालला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टात सुनावणीवेळी काय युक्तिवाद झाला?

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापूसन टंचाईच्या झळा बसत आहेत. तर मार्च एप्रिल महिन्यात उन्हाचा पार वाढला असून त्यामुळे पाण्याचा वापर ही वाढला आहे. यातच जिल्ह्यात सध्या भिषण पाणीटंचाई निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. सर्वांधीक पाणी टंचाई भुम तालुक्यात पाहायला मिळत असून या ठिकाणी 40 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com