जालन्यात घाणेवाडी व जायकवाडी पाणी पुरवठा योजनेतून 72 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी मी, तुमची राजकारणातील सासू आहे, काही गोष्टी मला विचारून करत जा, असा चिमटा जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांना काढला. जिल्ह्यात रावसाहेब दानवे यांच्या शिवाय काहीच शक्य नसल्याच सांगतं. सर्वपक्षीय नेत्यांना एका प्रकारे इशाराच दिलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला होता.
शहर सुधरले आता माणसाने सुद्धा विचार करायला पाहिजे की आपलं शहर आता कसं सुधारेल, असं मत रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केले आहे. पुढच्या 10 वर्षात जालना छत्रपती संभाजीनगर एक होईल असा विश्वास दानवे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जालना संभाजीनगर ला जोडायला मेट्रोची गरज पडेल. ते काम पण आपण करू असं दानवे म्हणालेत. विकासाठी आम्ही सर्व पक्षीय नेते एक असून विकासासाठी हा राम रथ आम्ही एकत्रित पने लढवू, असे प्रतिपादन दानवे यांनी जालन्यात बोलतांना केलंय. दानवे यांना जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा आज भाजपा पदाधिकाऱ्यांनी क्रेन च्या साहाय्याने 200 किलोंचा हार घालून त्यांचे अभिनंदन केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.