शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी बच्चू कडूंनी महाएल्गार मोर्चा पुकराला...हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सामील होऊन सरकारला घेरलं.. आणि अखेर सरकारच्या शिष्टमंडळाला धारेवर धरत.. बच्चू कडूंनी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबई गाठली. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी सरकारसमोर एक फॉर्म्युला ठेवलाय. हा फॉर्म्युला नेमका काय आहे?
कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा फॉर्म्युला
धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको
सरकारी नोकर, पेन्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको
टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतलेल्यांना कर्जमाफी नको
व्यापाऱ्यांना कर्जमाफी देऊ नका
गरजवंत शेतकरी शोधून त्यांनाच कर्जमाफी द्या
डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती तपासणं सोपं झालयं.. त्यामुळे गरजवंत शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा. लाडक्या बहिणीमुळे सरकार आधीच आर्थिक अडचणी सामना करतंय....त्यामुळे सर्वांना सरसकट कर्जमाफी देणं सरकारला परवडणारं नाही. त्यामुळेच कडूंनी दिलेला फॉर्म्युला सरकार मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.