अविनाश कानडजे
औरंगाबाद : औरंगाबाद आगार क्रमांक 1 मधील 201 एस. टी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना स्वेच्छा मरणाची परवानगी मिळण्यासाठी निवेदन दिले आहे. आमची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नसून आम्ही सतत तणाव पूर्व परिस्थितीत काम करत आहोत महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एस.टी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. (aurangabad news marathi)
महामंडळातील तुटपुंजे वेतनामुळे मानसिक त्रासाने ग्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वारंवार महामंडळाला निवेदन देऊनही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. शिवाय एवढ्या दिवस आंदोलन करूनही विलीनीकरणाचा विषय मार्गी लागत नाही. त्यामुळे आमच्याही मनात आत्महत्या करण्याचे विचार येतात परंतु आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर परवानगी मागत आहोत. जिल्हाधिकार्यांनी यावर लवकर उत्तर नाही दिले तर, 26 जानेवारी रोजी आम्ही आत्मदहन करू असा इशाराच एस.टी. कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.