सिल्लोड तालुक्यातील (Bodwad) बोदवड येथील रहिवासी असलेले दुर्गाबाई आणि सागर सपकाळ हे पती– पत्नी गावाकडे परत जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
दीड महिन्यापुवीच झाले लग्न
सदर अपघातात पतीचा जागेवरच मृत्यू झाला. तर पत्नीचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या लग्नाला अवघा दीड महिना झाला होता. दीड महिन्यातच काळाने घाला घातला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.