- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने साताऱ्यात जिल्हाधिकारी समोर आंदोलन करण्यात आलं.यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून पत्ते खेळत प्रतिकात्मक अनोखे आंदोलन केलं दरम्यान यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेची गरिमा मलिन केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
- दोन आठवड्यापासून पावसाने दिली होती दडी
- पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला
- सकाळपासुन जिल्ह्यात होते ढगाळ वातावरण तर आता जोरदार पावसाला सुरवात
- शेतकऱ्याच्या शेत पिकाला मिळणार संजीवनी
- वाऱ्यासह पावसाचे आगमन
नाशिकच्या सुरगाणा तालूक्यातील अंबाठाघाट,दातरीपाडा,काठीपाडा,भोरमाळ,प्रतापगड फाटा हा पावसामुळे खड्डेमय झाला आहे.डांग जिल्ह्यातील साकरपातळ पुल बंद झाल्याने अवजड वाहतूक याच मार्गाने होत असल्याने या रस्त्याची अक्षरक्षा चाळण होऊन रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने या परिसरातील वाहनधारकांना रस्त्याने जातांना मोठी कसरत करावी लागत असून,खड्डांमुळे अनेकांना मणक्याचे आजार तर प्रसूतीसाठी जाणा-या गर्भवती महिलेला त्रास सहन करावा लागत आहे,त्यामुळे या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करावी अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळाच्या सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळताना चा व्हिडिओ एक्स वर पोस्ट करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत असताना नाशिक मध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाला हजेरी लावत असताना ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन देण्याच्या पाहण्याने त्यांच्यावर पत्ते उधळण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी वेळ नाही म्हणून आम्ही त्यांना रमी खेळण्यासाठी बोलावत होतो अशी प्रतिक्रिया यावी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे
पाच लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच मोटरसायकलच्या मागणीसाठी किरण आशिष दामोदर या 26 वर्षाच्या विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. किरण आणि तिचा पती आशिष ला दीड वर्षाचा अधिर हा चिमुकला बाळ देखिल आहे. मात्र दारुड्या पतीच्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून किरण हिने आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीमागे सोडत 17 जुलै च्या मध्यरात्री बोऱ्हाडे वाडी येथील ए डी बॅडमॅन बॅडमिंटन अकॅडमी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवल आहे. किरण ने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
- इतर आरोपींनी देखील दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल केले.
- याने वेळेचा अपव्यय करायचा हा त्यांचा विचार.
- विष्णू चाटे पासून उर्वरित आरोपींनी देखील अर्ज केला.
- आम्ही त्या बाबत बाजू मांडली.
- वाल्मीक कराड ने जामीनसाठी अर्ज केला.
- वाल्मीक कराडसह इतर साथीदारावर इतर आरोप दाखल करावेत.
- दोष निश्चित झाल्यावर खटल्याला सुरवात होईल.
- दोन महिन्यात दोष मुक्तीचा आरोप अर्ज करायला हवा होता.
- आता यावर सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होईल.
- संपत्ती जप्तीच्या अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.
- खटला लांबणीवर पडतो अस काही नाही
- तसेच वाल्मीक कराडच्या संपत्ती अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे
- हा खटला तातडीने होऊन यावर सुनावणी होईल- उज्जवल निकम
देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या हाती महाराष्ट्राचे सर्वोच्च पद आहे. आता काळाची गरज आहे की आपण खन्या अर्थाने 'कीर्तीवंत व्हावे.
आम्ही पुकारलेल्या लढ्यातील मागण्यांना आपण मान्यता देऊन समस्त कष्टकरी, शेतकरी, वंचित, दिव्यांग जनतेला दिलासा द्यावा.
आमचे कुणाशी वैर नाही; मागण्या पूर्ण झाल्यास कष्टकरी समाजाच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू होईल. याच मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते. दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषिमंत्री मिळालाय त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानावरून लक्षात येतच. शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमी सारखा जुगार खेळून सिद्ध केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने विटा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष व भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पार पडलं या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह भाजपचे कार्यकर्ते आणि विटा शहरातील नागरिकांकडुन रक्तदान करण्यात येत आहे.
तामीळनाडूच्या व्यक्तीकडून मेळा आल्याची माहिती,
नागपूरसह देशभरातील अनेक विमानतळाना धमकी दिल्याची माहिती....
बॉम्ब शोधक पथक यांच्यासह सुरक्षा यंत्रनेकडून खबरदारी म्हणून चौकशी सुरू असल्याची प्रथमिक माहिती...
सोनेगाव पोलिसांनी दिली माहिती...
धाराशिव जिल्ह्यात तब्बल महिनाभराच्या अवकाशानंतर पावसाने हजेरी लावली. मागील महिनाभरात पाऊस न झाल्याने खरिपाची पिके माना टाकत होती. त्यामुळे संकटात सापडलेले शेतकरी पावसाची वाट पहात होते. मात्र धाराशिव जिल्ह्यातील कळंब , धाराशिव, तुळजापूर, लोहारा तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर काही भागात शेतात पाणी देखील साचले आहे. जिल्ह्यात यंदा पाच लाख हेक्टर हून अधिक क्षेत्रात पेरणी झाली असून सर्वाधिक साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे.
लातूर -
लातूर आणि रेणापूर शिवारात रात्री मुसळधार पाऊस
शेतकऱ्यांमध्ये समाधान, खोळंबलेल्या पेरण्या होणार सुरू
लातूर जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाने अक्षरशः दडी मारली होती
मात्र लातूर आणि रेनापुर तालुक्यात मध्यरात्री चार तास पाऊस झालाय.
पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल आहे. तर खोळंबलेल्या शेतीच्या पेरण्या देखील आता पूर्ण होणार आहेत.
बीड -
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी चार ऑगस्ट रोजी होणार.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सर्वच आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे सादर केले आहेत
सरकारी वकील उज्वल निकम यांनी जोरदार न्यायालयामध्ये विरोध केला
नवी मुंबई -
नवी मुंबई शहरात मुसळधार पावसाला सुरुवात
खारघर, बेलापूर, वाशी, नेरूळ या भागात पावसाची हजेरी
नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज
क्षणभर विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात
नालासोपाराच्या कळंब बीचवर आढळला कंटेनर
नालासोपाराच्या कळंब समुद्रकिनारी एक Hpcu 4 88919 नावाचा कंटेनर आढळून आला आहे
सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना हा कंटेनर दिसून आला.
त्यांनी तत्काल नालासोपारा पोलिसांना याची माहिती दिली.
सध्या हा कंटेनर कोणत्या कंपनीचा आहे हे अद्याप समजू शकले नाही.
मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर ची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे.
नंदुरबार -
प्रकाश गावाजवळील तापी आणि गोमाई नद्यांमध्ये रासायनिक हिरवे पाणी सोडल्यामुळे गावात भीतीचे वातावरण...
गेल्या चार दिवसांपासून प्रकाशा येथील गोमाई नदीमध्ये हिरव्या रंगाचे केमिकल युक्त पाणी....
नदीपात्रात सोडलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे मासे आढळले मृताअवस्थेत....
गोमाई नदीचे पाणी पूर्णपणे हिरवे झाले असून, काठावरही हिरव्या रंगाचा थर....
बीड -
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात विशेष सरकारी वकील न्यायालयात हजर सोबत सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे ही हजर.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडला जेल की बेल न्यायालयात होणार निर्णय.
वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आणि प्रॉपर्टी चार्जावर न्यायालय देणार आज निर्णय.
सरकारी वकील उज्वल निकम व बाळासाहेब कोल्हे यांची न्यायालयात उपस्थिती.
वाशिम -
वाशिमच्या पैनगंगा नदीला आला मोठा पूर
पुरामुळे जिल्ह्यातील रिसोड - मेहकर, करडा -गोभणी, सरपखेड - धोडप बुद्रुक हे मार्ग झाले बंद
तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प
नदी काठावरील गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
हिंगोली -
दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यात मंदिरात अडकलेल्या नागरिकांना केले रेस्क्यू
रात्री पासून अडकले होते मंदिरात धोकादायक स्थितीत
स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना बाहेर काढले
पुणे -
16 बांग्लादेशींना आज पुण्यातून परत पाठविले जाणार,15 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश
बेकायदा मार्गाने भारतात प्रवेश करून पुण्यात वास्तव्य करणार्या 16 बांग्लादेशी नागरिकांना काल त्यांच्या देशात पाठवून देण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
15 महिलांना पुणे विमानतळावरून, तर एका पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिले जाईल,अशी माहिती पोलिस आयुक्तयांनी दिली.
नांदेड -
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने जाळून घेत केली आत्महत्या
आगीत गंभीरित्या भाजलेल्या आनंदा जाधव यांचा मृत्यू
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील धक्कादायक घटना
कुंडलवाडी पोलिसांकडून पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक
आत्महत्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.
ही करतो नंतर... रिपोर्टरकडे सविस्तर मागवली आहे
हिंगोली -
सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी पुलावरून पाणी वाहिले
वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद
धोकादायक स्थितीत प्रवास करू नये प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
रत्नागिरी -
वाटद एमआयडीसीसाठी स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत उतरणार मैदानात
वाटद एमआयडीसी विरोधातील शेतक-यांच्या मोर्चानंतर आता समर्थकांची होणार जाहीर सभा
उद्योग मंत्री उदय सामंत वाटदमध्ये 26 जुलैला शेतक-यांच्या समर्थन सभेला जाणार
प्रकल्पाच्या विरोधाच्या धारेला पुराव्यानिशी बोलणार
वाटद एमआयडीसीचा संघर्ष आता आणखी चिघळणार
शेतकऱ्यांना विश्वासात घेवूनच प्रकल्पाचा निर्णय़ केला जाणार
धाराशिव -
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणेला तामलवाडी पोलिसांनी पुणे शहरातील तळेगाव दाभाडे येथून केली अटक
तर दुसरा फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग सोलापूर बस स्थानकातून घेतला ताब्यात
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अल्टिमेटम नंतर पोलीस विभाग अलर्ट, ड्रग्स प्रकरणातील आरोपी अटक सत्राला वेग
15 ऑगस्ट पूर्वी सर्व आरोपींना अटक करत मकोका लावा सरनाईकांनी दिला अल्टिमेटम
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 38 आरोपी, 27 आरोपी अटकेत तर अजूनही 11 आरोपी फरार
बीड -
वाल्मीक कराडला जेल की बेल बीडच्या विशेष मकोका न्यायालयात फैसला.
वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आणि प्रॉपर्टी जप्तीच्या अर्जावर आज न्यायालय देणार निर्णय.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती असणार.
पुणे -
ससून नियोजित शस्त्रक्रिया संपामुळे लांबणीवर
परिचारिकांच्या संपामुळे ससून रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून संप सुरू आहे.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ससून प्रशासनाने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील परिचारिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे गुरुवारपासून संप पुकारला आहे.'ससून' मधील ३४० परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत.
पुणे -
फुरसुंगीत सासऱ्याच्या हातून जावयाचा खून
सासऱ्याने गमजाने जावयाचा गळा आवळून आणि डोके फरशीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली.
फुरसुंगी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता वडकी येथील कैलासनगरमधील वलवा वस्ती येथे घडली.
लातूर -
विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद आजही लातूरमध्ये दिसणार.
मारहाणीच्या निषेधार्थ अहमदपूर शहर बंदची हाक.
रेनापुर येथे लातूर अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार.
पुणे -
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा वाढदिवस
दोन्ही नेत्याच्या कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करत आहेत
पर्वती परिसरात अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री चे फलक लावले आहेत
विकासाचा वादा अजित दादा असा आशा देखील उल्लेख
तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार जोडी तुटायची नाही साथ सुटायची नाही असे ही शहरात बॅनर लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.