
सुशील थोरात, साम प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जांबवाडी रस्त्यावर एका कारचा मोठा अपघात झालाय. या अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान हा अपघात झालाय. कारचे नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत पडली असून कारमधील ४ तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघात झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले असून विहित पडलेल्या मृतांना बाहेर काढत आहेत. क्रेनच्या साह्याने स्थानिक आणि पोलीस मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करताहेत.
जामखेड तालुक्यातील जांबवाडी रस्त्यावर एका कारचा अपघात झाला. कारचं नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर असलेल्या खडीमुळे कार विहिरीत पडली. कार विहिरीत पडल्याने कारमधील ४ जणांचा मृत्यू झालाय. हा अपघात संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान झाला. विहित पडलेल्या मृतांना बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साह्याने स्थानिक आणि पोलीस प्रयत्न करत आहेत. रामहरी शेळके, दादा शेळके, किशोर पवार,चक्रपाणि सुनील बारस्कर अशी विहिरीत पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास चार तरूण चाकी बोलेरो कारने जामखेडकडे येत असताना जांबवाडी शिवारात रस्त्यालगत असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर कार पन्नास फूट खोल विहिरीत पडली. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले. कार विहिरीत पडल्याचं समजाताच क्रेनच्या साह्याने विहिरीत पलंग सोडून कारमधील तरुणांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले.
चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता. चारपैकी दोघांचे लग्न झाले होते. त्यांना लहान लहान मुले आहेत. तर दोघे अविवाहित होते. ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.