सोलापूर: अंगणवाडीचे कामकाज अधिक जलद आणि सुखकर व्हावे यासाठी मागच्या सरकारने अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले होते. मात्र त्या मोबाइलचा दर्जा निकृष्ट असल्याने वेळोवेळी हे मोबाइल बंद पडत होते. त्यामुळे मोहोळमधील 300 अंगणवाडी सेविकांनी प्रशासनाला मोबाईल परत केले आहे. (300 Anganwadi workers from Mohol returned mobile phones to the administration)
हे देखील पहा -
या मोबाईलची दुरुस्ती करायलाच चार ते पाच हजारांचा खर्च यायचा, असा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील तब्बल 300 अंगणवाडी सेविकांनी हे मोबाइल प्रशासनाला परत केले आहेत. अंगणवाडी सेविकांच काम हे किचकट असल्याने त्यात सुधारणा व्हावी म्हणून हे मोबाइल देण्यात आले होते. मात्र या मोबाइलवरती काम करण्यासाठी देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ताही शासनाकडून वेळेवर मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत.
दरम्यान, सदरील मोबाइलची वॉरंटी संपल्याने, हे मोबाइल शासनाने परत घेऊन त्याऐवजी अद्यावत मोबाइल आणि वेळेवर भत्ता अंगणवाडी सेविकांना देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.