शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू
शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटना
शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू; अहमदनगर मधील हृदयद्रावक घटनाSaam Tv

अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव या ठिकाणी ३ मुलांचा पाण्यात बुडून, दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चैतन्य अनिल माळी (वय-१०) वर्ष दत्ता अनिल माळी (वय-७) वर्ष चैतन्य शाम बर्डे (वय-८) वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहेत. हे कान्हेगाव या ठिकाणी शेततळ्याजवळ- खेळत आसताना अचानक शेततळ्याचे पाणी बघण्यासाठी तळ्यात उतरले.

हे देखील पहा-

त्याठिकाणी त्यांचा तोल जाऊन एका पाठोपाठ तिन्ही मुले बुडल्याची माहिती जवळ असणाऱ्या नागरिकांना मिळाली. लगेचच तातडीने घटनासाठी नागरिकांनी गर्दी करत, मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. मात्र, तिन्ही चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अधिक तपास करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com