Yavatmal Rain Update : यवतमाळ पूर ओसरला, एक हजार 442 घरांसह अडीच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पालकमंत्री वाडी-वस्त्यांवर

Minsiter Sanjay Rathod News : पूरग्रस्तांना दिलासा देत नुकसान भरपाई शासनाकडून त्वरित देऊ असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्तांना दिला.
Minister Soil and Water Conservation of Maharashtra Sanjay Rathod, Yavatmal News, Yavatmal Rain Updates
Minister Soil and Water Conservation of Maharashtra Sanjay Rathod, Yavatmal News, Yavatmal Rain Updates saam tv
Published On

- संजय राठाेड

Flood In Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी पाऊस कोसळल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. बचाव कार्य करताना प्रशासनाची ही तारांबळ उडाली. एकाच वेळी अनेक ठिकाणी मदत पोहोचवताना कसरत करावी लागली. आता सर्वत्र पूर ओसरला असून नुकसानीचे भयानक दृश्य पुढे येऊ लागली आहे. (Maharashtra News)

Minister Soil and Water Conservation of Maharashtra Sanjay Rathod, Yavatmal News, Yavatmal Rain Updates
Shirdi Police News : शिर्डीत तीन लाखांचा गांजा जप्त, एकास अटक; तिघांचा शाेध सुरु

पावसामुळे प्राथमिक सर्वेक्षणात एक हजार 442 घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 275 घरे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. याबराेबरच 14 गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार 72 हजार 737 हेक्टरवरील पीक पूर्ण खरडून गेली आहे. प्रत्यक्ष सर्व्हे केल्यानंतर हा आकडा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Minister Soil and Water Conservation of Maharashtra Sanjay Rathod, Yavatmal News, Yavatmal Rain Updates
Amravati News : झोपडपट्टी परिसरातील अनिरुद्धची शिक्षणाची आस, ब्रिटिश सरकारची दीड कोटीची फेलोशिप

यवतमाळ जिल्ह्यात महापुराने शेत शिवारातील पिक अक्षरक्ष: पुर्णच खरडून गेली असून तब्बल अडीच लाख हेक्टरवरील पीकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरीत विशेष पॅकेज देण्याची मागणी होत आहे.

पालकमंत्र्यांनी घेतली दिग्रसच्या पूरग्रस्तांची भेट

यवतमाळच्या दिग्रस येथील धावंडा नदील आलेल्या पुराने शहरातील शेकडो संसार उध्वस्त व हजारो नागरिक उघड्यावर आले असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. पूरग्रस्तांना दिलासा देत नुकसान भरपाई शासनाकडून त्वरित देऊ व कुणालाही मदतीपासून वंचित ठेवणार नसल्याचा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरग्रस्तांना दिला.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खचलेला शेतकरी कपाशी व सोयाबीनला भाव नसल्याने खचून गेला होता. मात्र त्यातून कसेबसे सावरत यंदा पेरणी केली. आधीच उशिरा झालेली पेरणी व आता सतत कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेती जलमय झाली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात संकटाची मालिका थांबता थांबेना असे चित्र आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com