Maharashtra Election 2024: पुन्हा पूमन महाजन की भाकरी फिरणार? कसा आहे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचा इतिहास

Mumbai North Central Lok Sabha Constituency News in Marathi: २०२४ मध्ये मतदार कुणाला साथ देणार? २०१४ आणि २०१९ मध्ये काय घडलं? समजून घेण्यासाठी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि काही इंटरेस्टिंग आकडेवारी पाहुयात.
Poonam Mahajan
Poonam MahajanSaam TV
Published On

तुषार ओव्हाळ

North Central Lok Sabha Constituency History:

भाजप, शिवसेना, कम्युनिस्ट, आरपीआय अशा सगळ्या पक्षांना मुंबई उत्तर मध्यने कधीतरी साथ दिली आहे. गेली दहा वर्ष इथल्या मतदारांनी भाजपला साथ दिली. आता २०२४ मध्ये मतदार कुणाला साथ देणार? २०१४ आणि २०१९ मध्ये काय घडलं? समजून घेण्यासाठी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि काही इंटरेस्टिंग आकडेवारी पाहुयात.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ या जागेवर गेली दोन टर्म पूनम महाजन खासदार आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना, आरपीआय अशा एक ना अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी साथ दिलीये. २०१४ साली विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आणि त्या लोकसभेत पोहोचल्या. हे कसं काय शक्य झालं? हे समजून घेण्यासाठी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाचा इतिहास आणि काही इंटरेस्टिंग आकडेवारी या बातमीतून सोप्प्या भाषेत समजून घेऊ.

Poonam Mahajan
Maharashtra Lok Sabha Election : वर्ध्याची जागा मिळाली या पक्षाला? उमेदवारीसाठी काँग्रेसच्या या माजी आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

मुंबई उत्तर मध्य लोकसभेतील विधानसभा मदतारसंघ किती?

मुंबई उत्तर मध्य लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात विले पार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश आहे. त्यापैकी कुर्ला हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आता मुंबई उत्तर मध्य लोकसभेत 2014 मध्ये आणि 2019 मध्ये कोण किती मतांनी जिंकलं ते पाहुयात.

२०१४ मध्ये कोण किती मतांनी जिंकलं

२०१४ ला भाजपने दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या विद्यमान खासदारांना २ लाख ९१ हजार ७६४ मतं मिळाली होती. तब्बल १ लाख ८६ हजार ७७१ मतांनी महाजन यांनी दत्त याचा पराभव केला होता.

२०१९ मध्ये कोण किती मतांनी जिंकलं?

२०१९ साली भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार बदलले नाही. या वेळी महाजन यांना ४ लाख ८६ हजार ६७२ मतं मिळाली तर दत्त यांना ३ लाख ५६ हजार ६६७ मतं मिळाली. २०१४ च्या तुलने दत्त यांना ६० हजार मतं जास्त मिळाली होती. तर २०१४ च्या तुलनेत मताधिक्य हे ५० हजरांनी घटलं होतं.

दोन्ही वेळेला भाजपचा विजय झाला तरी पक्षाला मिळणारी आकडेवारी महत्त्वाची ठरते. ती काय? हे समजून घेण्यासाठी २०१४ आणि २०१९मध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळालीत ते जाणून घेऊयात.

२०१४ साली भाजपला ५६.६१ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला ३४.५२ टक्के मतं मिळाली होती. २०१९ ला भाजपला ५३.९७ टक्के तर काँग्रेसला ३९.५५ टक्के मतं मिळाली होती. २०१४ च्या तुलनेत भाजपला मिळालेली मते घटली होती तर काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला होता. भाजपच्या टक्केवारीत २.६४ मते कमी पडली. तर काँग्रेसची टक्केवारी ५.०३ टक्क्यांनी वाढली होती.

आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात कोणत्या पक्षाची ताकद मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये किती होती, हे जाणून घेऊ.

२०१९ ध्ये मुंबई उत्तर मध्यच्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोन, शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आला होता. २०१४ मध्ये हीच आकडेवारी होती. वांद्रे पूर्वमध्ये २०१४ ला शिवसेनेचा आमदार होता तिथे २०१९ ला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर चांदिवली मतदारसंघात २०१४ ला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता आणि २०१९ ला तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकला.

२०१४ आणि २०१९ नंतर आता २०२४ मध्ये काय चित्र आहे? महाराष्ट्राने ४ राजकीय भूकंप पाहिल्यानंतर कोण नेमकं कोणत्या गटात आहे? कुणी बंडखोरी केलीय? याचाही डेटा पाहुयात.

मुंबई उत्तर मध्यमधील सहापैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आलेत. त्यापैकी दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात गेलेत. त्यामुळे भाजप आणि महायुतीचे पारडे जड झाले आहे.कालिनाचे आमदार संयज पोतनीस हे ठाकरे गटात राहिलेत. पण वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकी यांचे वडील आणि माजी खासदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार गटात प्रवेश घेतलाय. इतकंच नाही तर झीशान सिद्दीकीनेही काँग्रेसवर तोफ डागलीये. झीशान यांनी अजूनतरी कुठला निर्णय घेतलेला नाही. पण आपल्यापुढे अनेक पर्याय आहेत असे म्हणत झिशान यांनी पक्षाला सूचक इशारा दिलाय.

पण फक्त यावरुन मुंबई उत्तर मध्यचा अंदाज बांधता येउ शकणार नाही. त्यासाठी आणखी काही बेसिक प्रश्नांची उत्तरं शोधाली लागतील.

२०१४ साली भाजपने पहिल्यांदा पूनम महाजन यांना तिकीट दिलं. २००९ साली महाजन यांनी घाटकोपर पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण मनसे उमेदवार राम कदम यांनी त्यांचा पराभव केला. पुढे २०१४ साली मिळालेल्या संधीचं महाजन यांनी सोनं केलं. गेली दोन टर्म त्या या जागेवरून निवडून गेल्यात.

या जागेवरून अजूनतरी कुठल्याच पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. पण विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा जनसंपर्क कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्ष महाजन यांना तिसऱ्यांदा संधी देणार का हे कळेलच. महायुती सोडून महाविकास आघाडीकडून ही जागा कोण लढवणार यावरूनही अजूनतरी पडदा उठलेला नाही. पण इथे काँग्रेचे प्राबल्य होतं, त्यामुळे काँग्रेस या जागेसाठी आग्रही असू शकते असंही सांगितलं जातं.

पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसंय?

२०१९ मध्ये विधानसभेच्या निकालानंतर युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यासह अनेक मतदारसंघाची गणितं बदललीत. त्यापैकी एक मुंबई उत्तर मध्य हा मतदारसंघ. २०१९ मध्ये या जागेच्या सहापैकी ३ जागा शिवसेनेच्या निवडून आल्यात.

पण तीनपैकी दोन आमदार शिंदे गटात गेलेत. त्यात काँग्रेसचा एकमेव आमदारही पक्षाशी नाराज आहे. त्यामुळे शिवसेचा पाय आणखी गाळात गेलाय. सध्या महायुतीकडे सहापैकी चार आमदार आहेत. त्यामुळे भाजप इथे सध्या तरी ताकदवान आहे. पण महायुतीकडून कुठला उमेदवार असेल आणि महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Poonam Mahajan
Maharashtra Lok Sabha Election : शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू? १२ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com