
बुधवार हा गणपतीचा वार मानला जातो.
मोदक गणपती बाप्पाचे आवडते अन्न आहे.
२१ दूर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते.
गणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गेल्या आठवड्यातील बुधवारच्या दिवशी बाप्पा विराजमान झाले. तर आज गपणती बाप्पा आले असतानाचा दुसरा बुधवार आहे.
बुधवार हा गणपतीचा वार मानला जात विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजेत त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास अत्यंत शुभ फल प्राप्त होते. विशेषत: गणेशोत्सव काळात केलेले उपाय अधिक प्रभावी आणि फलदायी मानले जातात.
साल २०२५ मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्टपासून झाली आहे. यावर्षी गणेशोत्सवातील बुधवार ३ सप्टेंबर रोजी म्हणजे आज आहे. बुधवार हा दिवस गणपती बाप्पाच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा असतो, कारण हा दिवस बुद्धी आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या गणेशाला समर्पित मानला जातो. या दिवशी त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतात.
गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत. विशेषत: गूळ आणि नारळ घालून केलेले ताजे मोदक त्यांना अर्पण करावेत. गणेशोत्सवातील बुधवारी ५, ११ किंवा २१ मोदक चढवणं अत्यंत शुभ मानलं जातं.
गणेश पूजेत दूर्वेचे विशेष स्थान आहे. बाप्पाला २१ दूर्वा तृण किंवा गाठी अर्पण कराव्यात. दूर्वा दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. अर्पण करण्याआधी दूर्वा गंगाजलाने शुद्ध करून त्यावर रोळी आणि अक्षता ठेवून गणपतीला अर्पण कराव्यात.
गणपती बाप्पाला विविध प्रकारचे लाडू प्रिय आहेत. बेसनाचे, रव्याचे किंवा मुगडाळीचे लाडू अर्पण करावेत. विशेषत: बुधवारी पिवळ्या रंगाचे बेसनाचे लाडू अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गणेशाला ५ किंवा ११ लाडूंचा भोग लावल्यास घरात सुख-समृद्धी नांदते.
फळंही गणेशाला अतिशय प्रिय आहेत. केळी, डाळिंब, नारळ किंवा पेरू अर्पण करावेत. बुधवारी विशेषत: दोन केळींची जोडी अर्पण करणं अत्यंत मंगलकारक मानले जाते. फळं गंगाजलाने शुद्ध करूनच पूजा स्थळी ठेवावीत.
गणपती बाप्पाला सिंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे. लाल किंवा केशरी रंगाचे सिंदूर त्यांच्या मस्तकावर लावले जाते. हे सौभाग्य, मंगल आणि रक्षणाचे प्रतीक मानले जाते.
गणेशोत्सवात बुधवार का महत्त्वाचा आहे?
बुधवार हा बुद्धी आणि समृद्धीचा देव गणपतीचा वार आहे.
गणपतीला कोणता नैवेद्य अत्यंत प्रिय आहे?
गूळ-नारळाचे ताजे मोदक गणपतीला अत्यंत प्रिय आहेत.
दूर्वा अर्पण करताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा?
दूर्वा गंगाजलाने शुद्ध करून रोळी-अक्षता टाकावी.
बुधवारी गणपतीला कोणते फळ अर्पण करावे?
दोन केळींची जोडी बुधवारी अत्यंत मंगलकारक आहे.
सिंदूर अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे?
सिंदूर अर्पण करणे सौभाग्य, मंगल आणि रक्षणाचे प्रतीक आहे
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.