
सोमवार हा भगवान शंकराला अर्पित दिवस आहे.
शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करणे शुभ मानले जाते.
सातमुखी रुद्राक्ष धारण करणे लक्ष्मीकृपा आणते.
सोमवार हा दिवस भगवान शंकराला अर्पण मानला जातो. देवांचा देव महादेव यांची या दिवशी विशेष पूजा केली जाते. असं मानलं जातं की, सोमवारच्या दिवशी शंकराची विधीपूर्वक पूजा करून उपवास केल्यास साधकाला धनसंबंधी अडचणींपासून मुक्ती मिळू शकते आणि सुख-समृद्धी वाढते.
सोमवारच्या दिवशी रुद्राक्षाशी संबंधित खास उपाय केल्यास महादेवांची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया. हे उपाय केल्याने त्याचा प्रभाव कसा पडतो ते पाहूयात.
सोमवारी शिवमंदिरात जाऊन शंकराला मनापासून प्रार्थना करा आणि शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करा. नंतर तो रुद्राक्ष प्रसाद म्हणून आपल्या जवळ ठेवा. असं केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि घरात सुख-शांती व समृद्धी नांदते.
ज्योतिषशास्त्रानुसार, सोमवारच्या दिवशी सूर्योदयाआधी स्नान करून सातमुखी रुद्राक्ष धारण करावा. या उपायामुळे लक्ष्मीदेवीची विशेष कृपा लाभते. त्याचप्रमाणे धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतात आणि सौभाग्य वाढतं.
धनवृद्धी आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी सोमवारच्या दिवशी विधीपूर्वक तेरामुखी रुद्राक्ष धारण करावा. या उपायामुळे घरातील आर्थिक तंगी हळूहळू दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पैशांची कमतरता राहत नाही.
सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर दूध, गंगाजल, चंदन, अक्षत आणि तिळांचं मिश्रण करून अभिषेक केल्यास मानसिक शांती मिळण्यास मदत होते.
महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास अकाल मृत्यूचा भय दूर होतो.
सूर्योदयाच्या वेळी गन्न्याच्या रसाने अभिषेक केल्यास जीवनातील अडचणी कमी होतात.
गरीबाला भरपेट अन्न दिल्यास घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही.
श्रद्धेनुसार गरजू लोकांना दान केल्यास पुण्य लाभते.
भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा-अर्चना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
सोमवारचा दिवस कोणाला अर्पण मानला जातो?
सोमवारचा दिवस भगवान शंकराला अर्पण मानला जातो.
शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण केल्याने कोणता फायदा होतो?
वैवाहिक अडचणी दूर होऊन घरात सुख-शांती येते.
सातमुखी रुद्राक्ष केव्हा धारण करावा?
सोमवारी सूर्योदयापूर्वी स्नान करून सातमुखी रुद्राक्ष धारण करावा.
तेरामुखी रुद्राक्ष धारण करण्याचा काय फायदा आहे?
तेरामुखी रुद्राक्ष धारण करण्याने आर्थिक तंगी दूर होते.
सोमवारी कोणत्या दानाने धनधान्याची कमतरता टळते?
गरीबाला भरपूर अन्न दिल्याने घरात धनधान्याची कमतरता राहत नाही.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.