Chanakya Niti On Life : या 5 गोष्टींपासून राहा सावधान, अन्यथा होऊ शकतो अकाली मृत्यू

Lifestyle : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या पैलूंवर लिहिले आहे, त्यांनी जीवनातील महत्त्वाच्या समस्यांवरील उपायांकडेही लक्ष वेधले आहे. चाणक्य नीतीनुसार, जर तुम्ही संपत्ती, मित्र, पत्नी आणि राज्य गमावले तर ते परत मिळू शकतात
Chanakya Niti For Life
Chanakya Niti For LifeSaam Tv
Published On

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या पैलूंवर लिहिले आहे, त्यांनी जीवनातील महत्त्वाच्या समस्यांवरील उपायांकडेही लक्ष वेधले आहे. चाणक्य नीतीनुसार, जर तुम्ही संपत्ती, मित्र (Friend), पत्नी आणि राज्य गमावले तर ते परत मिळू शकतात, परंतु जर तुमच्यावर रोगाचा हल्ला झाला आणि अकाली मृत्यू झाला तर सगळ हातातले गमवून बसाल.

चाणक्य नीतीमध्ये जीवनाशी संबंधित इतरही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जीवनात या गोष्टींचे पालन केल्याने एखादी व्यक्ती यश (Success) मिळवू शकते आणि आपले कौटुंबिक जीवन देखील आनंदी ठेवू शकते.

चाणक्य नीती म्हणते की आपण या 5 गोष्टींशी नेहमी काळजीपूर्वक वागले पाहिजे - अग्नि, पाणी, मूर्ख, साप आणि राजघराण्याचे सदस्य. कारण हे एका झटक्यात आपल्याला मृत्यूकडे नेऊ शकतात.

Chanakya Niti For Life
Chanakya Niti On Respect : या 5 सवयींमुळे माणसाला आयुष्यात कधीही आदर मिळत नाही, वाचा सविस्तर

आचार्य चाणक्य आपल्या नीतीमध्ये म्हणतात की अन्न, पाणी आणि गोड शब्द ही या पृथ्वीवरील खरी रत्ने आहेत. पण मूर्ख लोक दगडाचे तुकडे रत्न आहेत असे समजतात. माणसाचे कृत्य काहीही असो, ते नेहमी त्याचे अनुसरण करतात.

चाणक्य नीतीनुसार, एखाद्याच्या गाभ्यामध्ये जे आहे ते कसे बदलू शकते? जसे बांबूवर पाने दिसली नाहीत तर वसंत ऋतु काय करेल. जर घुबड दिवसा पाहू शकत नसेल तर सूर्याचा काय दोष? पावसाचे थेंब चातक पक्ष्याच्या चोचीत पडले नाहीत तर ढगांचा काय दोष?

Chanakya Niti For Life
Chanakya Niti On Education : चाणक्यांनी सांगितले शिक्षणाचे महत्त्व, मुलांनो या गोष्टी लक्षात ठेवाच!

चाणक्य नीती सांगतात की, या गोष्टी कधीही लपून राहत नाहीत. पाण्यावर तेल, दुष्टाला सांगितलेले रहस्य, योग्य माणसाला दिलेले दान आणि ज्ञानी माणसाला शिकवलेले शास्त्राचे ज्ञान त्यांच्या स्वभावामुळे लवकर पसरते.

चाणक्य नीतीनुसार, जर तुम्ही संपत्ती, मित्र, पत्नी आणि राज्य गमावले तर ते परत मिळू शकतात, परंतु जर तुमच्यावर रोगाचा हल्ला झाला आणि तुमचे शरीर गमावले तर ते परत मिळू शकत नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com